Our Thoughts http://mediacura.com/blog From Journey of Imagination to Journey of Creation Tue, 09 Jan 2018 15:54:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=4.8.23 नवे माध्यमप्रवाह आणि आपण http://mediacura.com/blog/2018/01/09/nave/ http://mediacura.com/blog/2018/01/09/nave/#respond Tue, 09 Jan 2018 07:06:18 +0000 http://mediacura.com/blog/?p=171 परेश प्रभू

संपादक, दै. नवप्रभा, गोवा

 

देशातील जवळजवळ 280 दशलक्ष साक्षर वर्तमानपत्रे वाचत नाहीत. आज देशातील 53 टक्के वाचक हा ग्रामीण वाचक आहे. या वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रादेशिक बाजारपेठेमध्ये असलेल्या संधी आता वृत्तपत्रचालकांच्याही लक्षात येऊ लागल्या आहेत, त्यामुळेच मोठमोठे वृत्तपत्रसमूह आज छोट्या छोट्या ग्राहकक्षेत्रामध्ये पाय रोवण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रे ताब्यात घेऊन आपल्या प्रचंड नेटवर्कचा लाभ त्यांना मिळवून देऊन आक्रमक मार्केटिंगद्वारे आणि खपवाढीच्या नवनव्या क्लृप्त्या वापरून त्या बाजारपेठा काबीज करण्यामागे लागल्या आहेत. देशातील आघाडीच्या वृत्तपत्रसमूहांनी देशी भाषांतील अनेक प्रादेशिक वर्तमानपत्रे ताब्यात घेऊन आपल्या समूहाच्या पंखांखाली आणलेली आपल्याला दिसतील. त्यांना त्यांनी आधुनिक रूप दिले आहे. आकर्षकता आणली आहे.

 

इंटरनेटचा वाढता प्रसार

एकीकडे प्रादेशिक माध्यमांमध्ये आशादायक चित्र दिसत असताना दुसरीकडे भारतातील वाढत्या इंटरनेट पेनिट्रीशनकडे दुर्लक्ष करता येणार नाही. इंटरनेटचा विस्तार वाढत चालला आहे. ब्रॉडबँड इंटरनेट सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. मोबाईल स्मार्टफोन आणि टॅब्लेटची मागणी प्रचंड वाढलेली आहे. संगणकांपेक्षाही टॅब्लेटला असलेली वाढती मागणी या स्थित्यंतराचा प्रत्यय देते. गार्टनर’ या मार्केट रीसर्च संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर यंदा संगणकाचा खप 8 टक्क्यांनी घटला, तर टॅब्लेटची विक्री मात्र 70 टक्क्यांनी वाढली आहे. स्मार्टफोन किंवा टॅब्लेटची खरी मजा चाखायची असेल तर त्यावर इंटरनेट जोडणी ही आवश्यक असते. त्यामुळे अशा इंटरनेटयुक्त उपकरणांच्या वाढत्या संख्येचा आणि त्यावरील
अॅप्सद्वारे आपली इतर कामे करता करता रोजच्या बातम्या बघण्याच्या वाढत्या सवयीचा परिणाम हळूहळू आपल्या पारंपरिक माध्यमांवर होणारच आहे. पाश्चात्य जगतामध्ये आज जे घडते आहे, ते लोण आपल्यापर्यंत यायला कदाचित आणखी काही वर्षे लागतील, परंतु कन्व्हर्जन्स हा या बदलत्या युगाचा परवलीचा शब्द आहे हे विसरून चालणार नाही.

 

भारतामध्ये आज 13 कोटी 70 लाख घरांमध्ये इंटरनेट जोडणी आहे. सन 2017 पर्यंत देशात 386 दशलक्ष घरांपर्यंत म्हणजे 38 कोटी घरांमध्ये इंटरनेट पोहोचलेले असेल. इंटरनेटयुक्त स्मार्टफोन्सची देशातील संख्या सन 2012 मध्ये 38 दशलक्ष होती, ती सन 2017 मध्ये 241 दशलक्षांवर जाईल असा अंदाज आहे. ही संख्या त्याहून मोठी असू शकते.

 

फेसबुकिस्तान, ट्वीटरीस्तान!

फेसबुकची ताकद काय असू शकते हे अलीकडेच काही देशांमध्रे झालेल्या उठावांतून पुरेपूर दिसून आले आहे. फेसबुकद्वारे राज्यक्रांती जशी घडू शकते, तशीच बंगलुरूमध्ये ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांची फेसबुकवरील अफवांमुळे जी पळापळ झाली तसे प्रकारही होऊ शकतात.

 

ट्वीटरवर जगातील पाचशे दशलक्ष म्हणजे पन्नास कोटी लोक आहेत. जून 2012 ते मार्च 2013 या काळात ट्वीटर वापरणा-यांच्या संख्येत 44 टक्के वाढ दिसून आली आहे. जगातील नेटिझन्सपैकी 21 टक्के लोक ट्वीटर वापरतात. यूट्यूबवर पाचशे दशलक्ष यूजर्स आहेत. दर सेकंदाला त्यावर जगाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यातून सरासरी एका तासाचे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि दरमहा सहा अब्ज तास व्हिडिओ पाहिले जातात. गुगल प्लसशी रोज 9 लाख 25 हजार नवे यूजर्स जोडले जात आहेत. लिंक्ड इन वर 200 देशांतील 26 लाख कंपन्यांची खाती आहेत. हा सगळा तपशील या नव्या युगाच्या नव्या संवाद माध्यमाचा विस्तार आणि नव्या पिढीवरील प्रभाव स्पष्ट करण्यास पुरेसा असावा. सोशल मीडियामध्ये वायफळ गोष्टींवर प्रचंड कालापव्यय केला जातो आणि या माध्यमाची खरी ताकद वापरलीच जात नाही हे जरी खरे असले, तरी जनमत घडवण्यात हे माध्यम मुद्रित वा टीव्हीसारख्या माध्यमाच्या तोडीस तोड योगदान देऊ शकेल हे लक्षात ठेवावे लागेल. म्हणूनच तर भारत सरकारने माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत या नव्या माध्यमांद्वारे आपल्या प्रचार मोहिमा राबवण्यासाठी एक विभाग स्थापन केला आहे.

 

 

वाचकाशी दुहेरी संवाद

झपाट्याने उदयास आलेल्या सोशल मीडियामध्ये चाललेला संवाद एकतर्फी नाही. तो दुहेरी संवाद आहे. त्यामुळे आपल्या वाचकाला एकतर्फी मजकूर न देता त्याच्या आवडीनिवडी, त्याची प्राधान्ये समजून घेऊन आणि त्याच्या म्हणण्याला महत्त्व देऊनच माध्यमांना पुढे जावे लागणार आहे. वाचकांचा प्रतिसाद आजमावून त्याच्याशी सुसंवाद प्रस्थापित करणे ही वाचक टिकवण्याच्या दृष्टीने आजची मोठी गरज आहे. शेवटी वृत्तपत्र हे वर्तमानाशी संबंधित असते. वर्तमानासोबतच त्यांना राहावे लागेल. वाचकाला गृहित धरण्याचे दिवस कधीच संपले आहेत. आजचा वाचक हा ‘वेल इन्फॉर्म्ड’ आहे. त्याला माहिती आणि ज्ञानाचे इतर अनेक पर्याय आज सहज उपलब्ध आहेत.

 

अनेक स्त्रोतांतून त्याच्याकडे अद्ययावत माहिती पोहोचत असते. वाचकानुनय करण्याच्या नादात वृत्तपत्रांचे गांभीर्य हरवत जाण्याची भीतीही निर्माण झालेली आहे. खप आणि दर्जा या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जे लोकप्रिय’ असते ते अभिजात’ असतेच असे नाही. पण जाहिरातींद्वारे खोऱ्याने पैसा कमावण्यासाठी काहीही करून खपाचे आकडे वाढवण्याची आज बहुतेक व्यवस्थापने धडपडताना दिसतात.

 

आपल्या भोवतीचा समाज बदलला, तत्याच्या आवडीनिवडी बदलल्या, धारणा बदलल्या, मूल्ये बदलली, अभिरुची बदलली, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक वातावरण बदलले. या सगळ्याचे प्रतिबिंब आजच्या प्रसारमाध्यमांतून उमटताना दिसते आहे. आजवर अनेक आव्हानांचा सामना करीत प्रसारमाध्यमांनी येथवर मजल मारली. भविष्याचा विचार करता येणारी आव्हाने अधिक कठीण असतील हे तर दिसतेच आहे. काळ कोणासाठी थांबत नसतो आणि प्रसारमाध्यमांची नाळ तर वर्तमानाशी जुळलेली आहे. त्यामुळे बदलत्या काळासरशी या क्षेत्रातही बदल अपरिहार्य आहेत.

 

पण या साऱ्या खटाटोपाच्या मुळाशी आहे तो सामान्य माणूस. या देशातील अडलेल्या नडलेल्या, खचलेल्या पिचलेल्या सर्वसामान्य माणसाला आधार आहे तो प्रसारमाध्यमांचा. त्याच्याकडे तो विेशासाने आणि आशेने पाहतो आहे. आपला आवाज बुलंद करणारे कोणीतरी आहे हा त्याचा विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही आणि आजच्या व्यावसायिक कालखंडातही पूर्वसुरींनी घालून दिलेल्या पत्रकारितेच्या उर्जस्वल परंपरेला तिलांजली द्यायची नाही एवढे भान जरी प्रसारमाध्यमांमध्ये वावरणाऱ्या प्रत्येकाने ठेवले तरी पुरेसे आहे. काळ बदलेल. वाचक बदलेल. तंत्रज्ञान बदलेल. माध्यमही बदलतील. बदलणार नाहीत ती पत्रकारितेची मूलतत्त्वे! त्यांच्याशी बांधीलकी राखणे हेच आजचे सर्वांत मोठे आव्हान आहे. सुदैवाने ही बांधीलकी असलेले पत्रकार आजही मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणूनच पत्रकारितेची प्रतिष्ठा टिकून आहे. आपला आब राखून आहे.

]]>
http://mediacura.com/blog/2018/01/09/nave/feed/ 0
Do’s and Don’ts for a lady Reporter http://mediacura.com/blog/2018/01/09/dos-and-donts-for-a-lady-reporter/ http://mediacura.com/blog/2018/01/09/dos-and-donts-for-a-lady-reporter/#respond Tue, 09 Jan 2018 07:05:30 +0000 http://mediacura.com/blog/?p=169 Manasi Saraf Joshi

Senior Journalist

Actually, the very statement is gender bias. While reporting I believe there should not be any gender bias. But still when my friend asked me to jot down a few points which may be called as tips for the young and aspiring women who want to enter into the field of journalism, I had to scramble through experiences of my friends, colleagues from this field. Being in this field for over a decade now, one thing I must confess is that though gender bias exists, but I think it should not be seen as a deterrent to carve a niche in this field. Any person be a girl or a boy if is honest, hardworking and true to the profession can excel in the field. Of course, given the societal norms there are a few occasions where there a few limitations for a girl reporter. Safety, working at odd hours and meeting the late night deadline could be among the few. One of my friends who’s working in the field for many years said, “I think more or less beats like covering corporation, crime and court demand more odd hours and it could be one of the limitations for a girl reporter. All these beats are heavy, with involvement from people of all strata of society and thus, it is possible for a male high rank officer to concede better to a male reporter than a female. Similarly, a lady reporter has to make extra efforts to make sources in these beats”, she felt. Safety is another aspect which she has to be alert all the time. Taking cue from the safety aspect, another young lady reporter felt, “I think while working on any beat, we must inform the senior where we are going and whom we are meeting. Sharing personal contacts or details, phone numbers or residential address should be avoided. Secondly, meeting an officer in an open space in his office and during the office hours is better than to meet him in his office after the stipulated office hours. Close or beyond work involvement with sources, partying or outing with the sources, beyond work related should be avoided. One of my male colleague feels that a lady reporter has to deal with the timings of the assignments, geographical locations etc. I have seen that women reporters are unwilling to go for assignments out of the city. This affects their career growth. But then it is not their fault but the society has failed to give them safe and secure conditions. Another aspect is of clothes which gives the first impression of a person. Clothes should be simple and according to the occasion. The reporter shouldn’t be shabby or clumsy and should be full of confidence. Submitting the reports on the given deadline and establishing cordial relations with one and all also can be few of the qualities of a reporter. All said, precision, perfection and listening attentively to what the source is telling is important for the young lady reporters. To the point questions, homework had done before any interview or special assignment help to establish a better rapport with the information source. Avoiding the length, unnecessary conversation saves on time”, feel a few.

Few of the international journalists who have worked in the war torn Afghanistan or other countries, specify on the dress code. According to them, while working in such countries, women must wear a head gear, wear full sleeve clothes and should not be aggressive or get into arguments with male crowd. Luckily in India we are privileged to report fearlessly. Ofcourse, the young brigade of the lady reporters feel that there shouldn’t be any such guidelines or tips for lady reporters. At last I could only say that opinions are diverse. (Writer is ‘Principal’ correspondent for Golden Sparrow weekly. She has worked for Indian Express DN newspapers as senior

reporter)

]]>
http://mediacura.com/blog/2018/01/09/dos-and-donts-for-a-lady-reporter/feed/ 0
बातमीचा प्रवास : घटनास्थळ ते टीव्हीचा पडदा http://mediacura.com/blog/2018/01/09/batmichapadada/ http://mediacura.com/blog/2018/01/09/batmichapadada/#respond Tue, 09 Jan 2018 07:05:12 +0000 http://mediacura.com/blog/?p=167 श्रीरंग गायकवाड, वृत्त संपादक, पुढारी, पुणे.

 

वर्तमानपत्राप्रमाणेच वृत्तवाहिनी अर्थात टीव्ही न्यूज चॅनेलचे रोजचे काम चालते. अर्थात या कामात मोठा फरक असतो तो वेगाचा आणि दृश्यांचा. (Visuals) म्हणजेच घटना ज्या क्षणी घडली त्याच क्षणी किंवा लवकरात लवकर ती टीव्हीच्या पडद्यावर झळकावी याला चॅनेल्समध्ये प्राधान्य दिले जाते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्या घटनेची दृश्य पडद्यावर दिसावीत यासाठी मोठे प्रयत्न केले जातात. कारण टीव्ही हे दृश्य माध्यम आहे.

 

 

‘टीव्हीवर पाहिले’ आणि ‘पेपरात वाचले’ असे म्हणतात ते यामुळेच. वृत्तपत्रांची एक ‘डेडलाईन’ (बातमी छपाईला देण्याची शेवटची वेळ) ठरलेली असते. म्हणजे आपल्याकडे रात्री उशीरा 11 ते 1 वाजेपर्यंत वृत्तपत्राच्या संपादकीय विभागात बातमीदार बातम्या देतात. त्यानंतर छपाई सुरू होते आणि पहाटेच ताज्या बातम्यांसह पेपर घराघरांत जाऊन पडतो. टीव्हीचे मात्र तसे नसते. ज्या क्षणी घटना घडली, त्यानंतर काही क्षणांतच ती पडद्यावर दाखवली जाते. त्यामुळे टीव्ही रिपोर्टरचे काम हे वर्तमानपत्राच्या रिपोर्टरपेक्षा अधिक धावपळीचे असते. त्यांना विशिष्ट अशी ‘डेडलाईन’ नसते.

 

न्यूज चॅनेल्सकडे बातम्या येतात कुठून?

वृत्तपत्राप्रमाणेच टीव्ही न्यूज चॅनेल्स गावोगावी, तालुका, जिल्हा, परराज्य, परदेशात आपले बातमीदार नियुक्त करतात. टीव्हीच्या बातम्यांचा वेग लक्षात घेऊन वृत्तसंकलनासाठी त्यांच्याकडे आधुनिक साधने दिलेली असतात. त्यांच्या सहाय्याने ते बातम्या पाठवतात. तसेच चॅनेल्सचे मुख्य ऑफिसात स्वत:च्या बातमीदारांचा ताफा असतो. याशिवाय टीव्ही चॅनेल्सना बातम्या पुरवणाऱ्या काही व्यावसायिक संस्था असतात. त्याही देशपरदेशातील बातम्या दृश्यांसह न्यूज चॅनेल्सच्या ऑफिसमध्ये पाठवत असतात. काही चॅनेल्स परदेशातील चॅनेल्सशी सहकार्य करार करतात. त्यामुळे त्यांना त्या देशातील तसेच इतर देशांतील बातम्या मिळतात. उदा. ‘सीएनएन-आयबीएन’ हे नॅशनल चॅनल. आयबीएन या भारतीय चॅनेलने अमेरिकेच्या सीएनएन या चॅनेलशी करार केलेला आहे. त्यामुळे सीएनएन चॅनेलवरील अमेरिका तसेच जगभरातील बातम्या त्यांना मिळतात. त्या ते भारतीय प्रेक्षकांना दाखवतात. याशिवाय ‘सीटिझन जर्नलिस्ट’ ही संकल्पना आता अधिकाधिक रुजू लागली आहे. यामध्ये नागरिक त्यांना उत्स्फुर्तपणे चॅनेल्सला बातम्या पाठवतात.

 

बातम्या पाठवण्याची साधने कोणती आहेत?

वृत्तपत्रांच्या कार्यालत लँडलाईन टेलिफोन, मोबाईल, फॅक्स आदी संपर्क साधनांच्या सहाय्याने बातम्या पाठवल्या जातात. टीव्ही चॅनेल्सचे रिपोर्टरही या साधनांचा आधार घेतात. अर्थात बातमी लवकरात लवकर द्यायची असल्याने ते सध्या मोबाईल, ईमेल, व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियाचा प्रभावी वापर करताना दिसतात.

 

वर्तमानपत्राचे बातमीदार पूर्वी कागदावर बातमी लिहून फॅक्स करत. आता बातमी संगणकावर टाईप करून पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. चॅनेल्सचे रिपोर्टर मात्र बातमी मोबाईलवरूनच किंवा संगणकावर टाईप करून मेल करतात.

 

चॅनेल्सच्या रिपोर्टर्सना केवळ मजकूर पाठवून भागत नाही तर त्यांना त्या घटनेचे फुटेज अर्थात दृश्ये पाठवावी लागतात. त्यासाठी त्यांना व्हिडिओ कॅमेरा दिलेला असतो. त्याच्या सहाय्याने टिपलेली दृश्ये ते ‘इंटरनेट’, ‘लीजलाईन’, ‘ओबी व्हॅन’, ‘बॅकपॅक’ आदींच्या माध्यमातून पाठवतात. यापैकी लीजलाईन ही ब्यूरो ऑफिस म्हणजे चार-पाच जिल्ह्यांसाठी असलेल्या ऑफिसात बसवलेली असते. तर ओबी अर्थात आऊटडोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅन म्हणजे चालते बोलते थेट प्रक्षेपणच असते. या डोक्यावर गोल अँटेना लावलेल्या व्हॅनच्या सहाय्याने घटनास्थळावरून घटनेचे थेट प्रक्षेपण केले जाते. चॅनेलच्या स्टुडिओमधून ज्याप्रमाणे प्रक्षेपण होते, त्याचप्रमाणे उपग्रहाच्या सहाय्याने ओबी व्हॅनच्या द्वारे आपल्याला टीव्हीवर थेट दृश्ये दिसू लागतात. ओबी व्हॅनचाच लहान अवतार म्हणजे बॅकपॅक. नेहमीच्या सॅकप्रमाणे एक मनुष्य पाठीवरून वाहून नेऊ शकेल अशा या साधनाच्या सहाय्याने आता बहुतेक न्यूज चॅनेल्स थेट प्रक्षेपण करतात. भविष्यात हे तंत्र अधिकाधिक प्रगत होत जाणार आहे. इंटरनेट ‘फोर जी’ सुविधा आल्यानंतर तर अगदी हातातील मोबाईलवरूनही असे घटनेचे थेट प्रक्षेपण होऊ शकेल.

 

बातमी टीव्हीवर पहिल्यांदा कशी दिसते?

बऱ्याचदा बातमीदाराला घटना माहीत झालेली असते, परंतु दृश्ये (Visuals) मिळालेली नसतात. ती मिळेपर्यंत बातमीदार थांबत नाही. तर तो तातडीने मेसेज अथवा फोन करून आपल्या ऑफिसात ती बातमी कळवतो. मग पहिल्यांदा ही बातमी टीव्ही स्क्रीनच्या खालच्या पट्टीवर अक्षरांमध्रे झळकू लागते. त्याला ‘टिकर’ असे म्हणतात. बातमी मोठी, महत्त्वाची असेल तर त्या पट्टीवरच ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून ती झळकू लागते. बातमी जर अगदीच मोठी असेल तर चॅनेलवर सुरू असलेल्या नेहमीच्या बातम्या अथवा कार्यक्रम थांबवून ती बातमी दाखवण्यास सुरुवात करतात. दृश्ये पोहोचलेली नसतील तर मोठमोठ्या अक्षरांतील बातमीचे ग्राफिक्स टीव्ही स्क्रिनवर झळकू लागते. बातमीच्या महत्त्वानुसार त्याला ‘ताजी बातमी’, ‘मोठी बातमी’, ‘ब्रेकिंग न्यूज’ आदी संबोधले जाते. ती बातमी अथवा घटनेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी संबंधित बातमीदाराचा ‘फोनो’ घेतला जातो. म्हणजेच बातमीदार फोनवर घटनेविषयी सविस्तर माहिती सांगतो. बहुदा अपघात, दुर्घटना अशा प्रकारच्या बातम्या पहिल्यांदा अशाप्रकारे दाखवतात. दृश्ये मिळाल्यानंतर ग्राफिक्सऐवजी लगेचच स्क्रीनवर दृश्ये झळकू लागतात.

 

बातमी चॅनेलच्या ऑफिसात पोहचल्यावर काय प्रक्रिया होते?

आलेली बातमी टीव्हीच्या पडद्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने पुढील विभाग कार्यरत असतात – इनपुट / असाईनमेंट (Input / Assignment) – या विभागाकडे प्रामुख्याने बातमीदारांचे नियंत्रण असते. बातम्यांचे नवनवीन विषय शोधणे, बातमीदारांकडून ते करवून घेणे, त्यासाठी बातमीदाराकडे पाठपुरावा करणे, आलेल्या बातम्या चॅनेल हेड, व तसेच न्यूजरुममधील सहका-यांना कळवणे आदी कामे इनपुट किंवा असाईंनमेंट विभागाकडे असतात. न्यूजरुमला बातम्या मिळतात त्या इनपुट विभागाद्वारे. या विभागाकडून आलेले मेसेज, दृश्यांबाबत संबंधितांना कळवले जाते.

 

एमसीआर (Master Control Room)-

टीव्हीच्या ऑफिसात वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या बातम्यांचे फुटेज अर्थात दृश्ये येत असतात. उदा. एकाच वेळी एखाद्या ठिकाणाहून क्रिकेटमॅच, दुसऱ्या ठिकाणाहून एखादा जाहीर कार्यक्रम, तिसऱ्या ठिकाणाहून ग्रामीण भागातील दुष्काळ, चौथ्या ठिकाणाहून बॉलीवूडचा एखादा कार्यक्रम इ. दृश्ये येत असतात. त्यांचा योग्य समन्वय आणि वर्गवारी करून ती दृश्ये साठवून ठेवण्याचे काम हा विभाग करतो. त्यासाठी इनपुट विभागाशी समन्वय ठेवला जातो.

 

आउटपुट –

इनपुटसोबतच आउटपुट विभाग न्यूज चॅनेलमध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण ‘ऑन एअर’ अर्थात टीव्ही स्क्रीनवर बातम्या दाखवण्याची अंतिम जबाबदारी या विभागाची असते. वर्तमानपत्रातील ‘डेस्क’ अर्थात संपादकीय विभागाप्रमाणे टीव्हीमध्ये आउटपुट काम करत असते. बातम्यांची निवड करणे, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे, बातम्यांमध्ये आवश्यक ते बदल करणे, एखादी घटना किती वेळ दाखवायची याचा निर्णय घेणे आदी महत्त्वाची कामे आउटपुट करतो.

 

प्रोडक्शन –

वरील सर्व विभागांप्रमाणे प्रोडक्शन विभाग महत्त्वाचा असतो. कारण तो प्रत्यक्ष बातम्या तयार करत असतो. टीव्हीवरील प्रत्येक बातमी म्हणजे एक छोटा सिनेमाच असतो. त्यामुळे दृश्ये व्यवस्थित आणि परिणामकारकरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावीत यासाठी हा विभाग दृश्यांचे संपादन करत असतो. या विभागात चॅनेलच्या गरजेनुसार अनेक प्रोड्युसर्स, व्हिडिओ एडिटर काम करत असतात. आलेली दृश्ये साफसूफ करून, व्यवस्थित करून प्रक्षेपणासाठी देणे हे या विभागाचे मुख्य काम असते.

 

पीसीआर (Production Control Room) –

या विभागाला स्टुडिओ कंट्रोल रुम असेही म्हणतात. बातम्यांवर सर्व विभागांचे संस्कार झाल्यानंतर त्या ‘ऑन एअर’ अर्थात टीव्हीवर दाखवण्याचे अंतिम तांत्रिक काम हा विभाग करतो. या विभागाचे संचलन स्टुडिओ डायरेक्टर करतो. तो स्टुडिओत बातम्या देत असलेल्या अँकरला सूचना देत असतो. तसेच एमसीआर, आउटपुट, प्रोडक्शन या विभागांशी संपर्कात असतो. या विभागात स्क्रीनवर विविध आकाराच्या विंडोज अर्थात खिडक्या बनवणारे, आवाज कंट्रोल करणारे, टिकरपट्टी फायर करणारे, अँकर ज्यावर बातम्या वाचतो तो टेलिप्रिंटर चालवणारे, आवाज कंट्रोल करणारे आदी कर्मचारी काम करत असतात. स्टुडिओतील इंजिनिअर्स, कॅमेरामन यांच्याशीही हा विभाग समन्वय ठेवून असतो.

 

(लेखक हे दै. पुढारी, पुणे येथे वृत्तसंपादक म्हणून कार्यरत असून मराठी वृत्तवाहिन्या आयबीएन-लोकमत व मी मराठी साठी अनुक्रमे असोसिएट एडिटर व न्यूज एडिटर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.)

]]>
http://mediacura.com/blog/2018/01/09/batmichapadada/feed/ 0
जनता आणि शासनादरम्यानच्या संवाद-सेतूची भूमिका बजवावी http://mediacura.com/blog/2018/01/09/janataansahaan/ http://mediacura.com/blog/2018/01/09/janataansahaan/#respond Tue, 09 Jan 2018 07:04:47 +0000 http://mediacura.com/blog/?p=165 मिलिंद बांदिवडेकर

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.

 

प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि शासकीय कार्यालये यांचा दररोजचा संबंध असतो. पण शासकीय कार्यालये आणि विविध योजनांबाबत वृत्तांकन करीत असताना काही पथ्ये आणि व्यावसायिक मूल्ये पाळणे गरजेचे आहे. याचे पालन करून केलेली पत्रकारिता शासन आणि जनता यांच्यातील संवादाचा सेतू बनते.

 

साध्या शब्दात म्हणायचं झालं तर वार्तेचं हरण करणारा तो वार्ताहर. काही वर्षांपूर्वी केवळ तालुका, जिल्हा स्तरावर कार्यरत असणाऱ्या वार्ताहरांच विेश, सध्या अगदी गाव पातळीपर्यंत विस्तारलं आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाहिलं तर छापून आलेल्या सर्व मजकुरावर अगदी आजही जनतेचा विेशास कायम राहिला आहे. सध्याच्या माहितीच्या विस्फोटाच्या युगात इलेक्ट्रॉनिक मिडीयाद्वारे विविध वाहिन्यांद्वारे 24 तासाच्या बातम्यांच्या प्रसारण काळातही प्रिंट मिडीयाचं महत्व अबाधित राहिलं आहे. पूर्वी एकच वार्ताहर किंवा बातमीदार अनेक प्रकारच्या घटनांवर आधारित बातम्या लिहित असत. पण सध्या व्यापक बदल झाला आहे. वृत्तसंकलनात स्पेशलायझेशन आले आहे. क्रीडा, व्यापार, राजकारण, समाजकारण, शिक्षण वेगळे उपक्रम तसेच अनेक विषयानुसार वृत्तसंकलन व बातमीदारी होत आहे. याचबरोबर वृत्तपत्र सृष्टीचं उद्योग म्हणूनही स्वरूप बदलत आहे. यामुळे आर्थिक स्थैर्यता प्राप्त झाल्याने अनेक युवक युवती या सृष्टीकडे आकृष्ट होताना दिसत आहेत. प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक मिडिया असो या सर्वांचा पारा विश्वासार्हता या शब्दावर अवलंबून असतो. खाजगी असो किंवा शासकीय असो यामध्ये अधिकृत, विेश्वासार्हता या दोन बाबी वृत्तसंकलनाचे दृष्टीकोनातून महत्वाच्या आहेत.

 

राज्य शासन, केंद्र सरकार किंवा अंगीकृत असलेली विविध महामंडळ यापासून शासनस्तरावरील शेवटचा घटक म्हणजे ग्रामसेवक व तलाठी. या शासकीय घडमोडींचं वृत्तांकन करताना शासकीय कारभाराचं ज्ञान, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या बरोबरचा संपर्क, आदी बाबी वार्ताहराच्या बाजूने अत्यंत महत्वाच्या आहेत. शासन निर्णयांचा (जी.आर) अभ्यासाबरोबरच गाव पातळीपासून मंत्रालय पातळीपर्यंत शासनाची कार्यप्रणाली कशी सुरु असते याची बऱ्यापैकी जाण असणे महत्वाचे आहे. अधिकृतरीत्या कोणती माहिती कोणाकडून उपलब्ध होईल हे अनुभवातून अधिक स्पष्ट होत असलं तरी शासकीय वृत्तसंकलनासाठी वार्ताहराने यासाठी अभ्यासूवृत्ती जोपासून आपल्या वैयक्तिक ज्ञानात भर घालायला हवी.

 

रोजच्या दैनिकांमधून शासनाचे विविध विभाग असोत किंवा योजना असोत या संदर्भात चांगल्या तसेच तक्रारीबाबत बातम्या प्रसिद्ध होतात. या अनुषंगाने या बाबतीतील कोणतीही बातमी एकांगी होऊ नये. जनतेपर्यंत तक्रार व शासनाची बाजू या दोन्हींचा बातमीत समावेश करून वस्तुस्थिती निर्दशक माहिती देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. गावपातळी असो किंवा मोठी शहर, जिल्ह्याची किंवा तालुका मुख्यालय या प्रत्येक ठिकाणचा वैयक्तिक संपर्क किती मजबूत आहे यावर योग्य माहिती मिळण्याचा स्त्रोत अवलंबून असल्याने या फिल्डवर काम करणाऱ्या वार्ताहरांनी हा दृष्टीकोन ठेऊन आपला संपर्क विस्तारित करायला हवा.

 

सर्वसाधारणपणे गावपातळी सोडली तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस प्रमुख असे वार्ताहरांचे तीन बीट कार्यरत असतात. तालुका पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर शासकीय कार्यालयांसाठी एकच वार्ताहर कार्यरत असतो. तालुकास्तरावर कार्य करणाऱ्या वार्ताहरांचा तालुका स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचा-यांशी सुसंवाद हवा. कारण बातमीचा माहितीचा स्त्रोत म्हणून यांचेकडूनच अधिकृत माहिती मिळते. तालुक्याची भौगोलिक रचना, रस्ते विकास याचाही त्यांना परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. शासन निर्णय कसे होतात, विधानसभा, विधानपरिषद या दोन सभागृहात निर्णय प्रक्रिया कशी होते इथपासून जिल्हा पातळीवर शासन निर्णयांची अंमलबजावणी कशी होते याचं सखोल ज्ञान जिल्हा पातळीवर विविध बीट अनुसार वृतांकन करणाऱ्या वार्ताहरांना हवं. शासकीय वृत्तामध्ये महत्वाची बाब म्हणजे अशा प्रकारचे वृत्तसंकलानासाठी संबंधित योजना, योजनेचा शासन निर्णय, अंमलबजावणी करणारा अधिकारी यांचे माध्यमातून मिळणारी माहिती व त्यावर आधारित वृत्त अशी कार्यप्रणाली राबवणे गरजेचं आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, रोहयोद्वारे वृक्ष लागवड, ऊस पाचट उपक्रम आदी अलीकडच्या काळातील योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावली. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वार्ताहरांनी अगदी गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत या योजनांची विविध माध्यमांद्वारे यशस्वीपणे मांडणी केली.

 

शासकीय काम अन् सहा महिने थांब, शासनाचा कारभार म्हणजे असाचं, अशा काही प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये दिसून येतात. या परिस्थितीत यामध्ये संबंधित वार्ताहराची भूमिका महत्वाची असते. या विभागाने विविध विषयांवर प्रस्तुत केलेली वृत्ते, लेख, यशकथा याची परिणामकारकता लक्षात घेऊन त्याचे संकलन करून ती प्रसिद्ध करण्याची कामगिरी वार्ताहरांना करावी लागते.

 

शासकीय विभागांनी आयोजित केलेले पत्रकार पाहणी दौऱ्यात शासनाची चांगली बाजू किंवा झालेला विकास दाखविण्याच्या संबंधित विभागाचा प्रयत्न असतो. यामध्ये काही आढळल तर वार्ताहरांनी वृत्तांकन करताना संबंधित अधिका-यांशी त्यावेळी चर्चा करून अधिकृत माहितीवर आधारित वृत्त करण्यावर भर द्यायला हवा. दैनिक, साप्ताहिक, दुरचित्रवाहिन्या यांच्या प्रतिनिधींनी तक्रारी स्वरूपाच वृत्तांकन करताना संबंधित शासकीय विभागाच्या अधिका-यांशी याबाबत सम्यक चर्चा व माहिती घेऊनच वृत्त प्रसृत होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे.

 

शासनामार्फत प्रसृत होणाऱ्या शासन निर्णयांची भाषा क्लिष्ट स्वरुपाची असेल तर शासन निर्णय जनसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत संबंधित वृत्त प्रसृत होईल असं पाहायला हवं. काही प्रसंगी शासन निर्णय ज्या शासकीय विभागाशी संबंधित आहे त्या विभागाच्या अधिका-यांशीही समक्ष संपर्क साधून व चर्चा करून त्यावर आधारित वृत्त प्रसृत करायला हवं.

 

शासकीय वृत्तसंकलानाबाबत पाळावयाची पथ्य या संदर्भात भरपूर उहा-पोह करता येईल. तथापि अधिकृत माहिती, नेमकेपणा, बिनचूक आकडेवारी, अधिकारी किंवा कर्मचारी वर्गाशी सौहार्दपूर्ण संपर्क, या बाबी अंगी बाणविल्यास शासकीय वृत्त अधिक मुद्देसूद, माहितीपूर्ण, वाचनीय होऊ शकते.

]]>
http://mediacura.com/blog/2018/01/09/janataansahaan/feed/ 0
तंत्रज्ञान, कौशल्ये आणि विेश्वासार्हता! http://mediacura.com/blog/2018/01/09/tantragyan/ http://mediacura.com/blog/2018/01/09/tantragyan/#respond Tue, 09 Jan 2018 07:04:20 +0000 http://mediacura.com/blog/?p=163 संतोष देशपांडे संचालक मिडियाक्यूरा इन्फोलाइन, पुणे

(santosh@mediacura.com)

 

मराठी पत्रकारिता सध्या वेगळया संक्रमणावस्थेतून जात आहे. हे संक्रमण प्रामुख्याने तंत्रज्ञान आणि नवा वाचकवर्ग यांच्या मिलाफातून घडते आहे. ग्रामीण पत्रकारितेचे केंद्रस्थान हा बातमीदार असायचा. आजही तो आहे, मात्र त्याची पत्रकारितेवरील मक्तेदारी पूर्वीसारखी राहिलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, समाजाला आता स्वतःला व्यक्त होण्यासाठीचे माध्यम मोबाईल व इंटरनेटच्या निमित्ताने लाभले आहे. अमूक वा तमूक बातमी प्रसिद्ध करण्यासाठी स्थानिक बातमीदारांवर विसंबून राहण्याची वृत्तीही कमी होत चाललेली आहे.

 

त्यात पुन्हा, इलेक्ट्रॉनिक विशेषतः टीव्ही माध्यमाचे असणारे आकर्षण प्रभाव आणि त्याची व्याप्ती यांमुळे वृत्तपत्रांच्या बातमीदारीला एका निराळ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय. आघाडीच्या वृत्तपत्रांनी जिल्हावार आवृत्या काढल्या तरी त्यांचा प्रभाव हा ठराविक जिल्ह्यांपुरता मर्रादित राहतो असा सूर आहे. मात्र, त्याच आवृत्या या ई- पेपरच्या माध्यमातून जगभरात वाचल्याही जातात, ही देखील तंत्रज्ञानाने दिलेली देणगी म्हणावी लागेल. म्हणून, ग्रामीण असो वा शहरी बातमीदारांचे महत्त्व कमी झालेले नसून, त्यांना अद्ययावत होण्याची संधी नव्या माध्यमसंस्कृतीने दिलेली आहे. या संधीचा लाभ जे घेतील, त्यांनाच भवितव्य असेल व जे यापासून दूर राहतील, त्यांना तक्रार करण्याचीही संधी मिळणार नाही, इतक्या वेगाने तंत्रज्ञान बदलते आहे.

 

खरं सांगायचं तर तंत्रज्ञान ही आपल्यापुढे आलेली सुविधा आहे. मात्र, तिचा योग्य तेव्हा आणि योग्य तोच वापर केला गेला तरच त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येऊ शकतो. समाजातील अन्य घटकांच्या तुलनेत पत्रकाराला काकणभर सरस ज्ञान आणि माहिती असावी, अशी एक स्वाभाविक अपेक्षा समाजामध्रे असते आणि ती योग्यच आहे. म्हणूनच, केवळ बातमी समजणे, ती व्यवस्थित लिहिणे आणि ती तितक्याच तत्परतेने पोहोचविणे इतकेच काम आता पुरेसे नाही. तंत्रज्ञानाप्रमाणेच, वाचकांच्या अपेक्षांनीही कात टाकलेली आहे.

 

बातम्या चकटन् समजणे याहीपेक्षा त्या बातम्यांचा अर्थ लावता येणे व तो व्यक्तही करता येणे हे अधिक महत्त्वाचे आहे. अमूक गोष्ट घडली, अशा ब्रेकिंग न्यूज आता टीव्हीप्रमाणेच, सोशल मिडियावरही येतात. मात्र, त्यांचे विश्‍लेषण करता येईल किमान इतकी माहिती आणि विषयातील किमान समज ज्याच्याकडे असेल त्यालाच नव्या समाजामध्ये खरा मान मिळेल. येत्या पाच-दहा वर्षांत विलक्षण आकलनशक्ती असणारा आणि तंत्रज्ञानाची समज असणारा वाचकवर्ग तयार होतो आहे. त्याला आपण पत्रकार म्हणून काय देऊ शकतो, याचे चिंतन केले तरी आपण सध्या कुठे आहोत, याची नेमकी जाणीव होऊ शकेल. तंत्रज्ञान बदलले, नवनवीन गॅझेटस् हाती आली तरी भाषेवरील प्रभुत्व, शब्दांचे नेमके अर्थ, कोणता शब्द कुठे वापरावा याची योग्य जाणीव, मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्याचे संकेत, समाजातील विश्वासार्हता अशा कितीतरी बाबी या कायमच महत्त्वाच्या असणार आहेत.

 

इंटरनेटमुळे प्रिंट आणि ऑडिओ-व्हीडीओ अशा दोन्हींचा झालेला अनोखा मिलाफ, त्यातून तयार झालेला नवा वाचकवर्ग, नव्या पिढीची बदललेली भाषा आणि अभिव्यक्ती या सर्व बाबींचा विचार करता, वेब मिडिया अत्यंत प्रभावी माध्यम म्हणून उदयास आले आहे. मागील काही वर्षांत सोशल मिडियावरील विविध प्रवाहांतून आपण ते अनुभवतोच आहे. देशात राजकीय मतपरिवर्तनामध्ये प्रथमच सोशल मिडियाने मोठा हातभार लावला हे यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांनी दाखवून दिले आहे. टीव्ही अथवा वृत्तपत्रांनी बातम्या टाळूनही मध्यंतरी अनेक ठिकाणी सोशल मिडियावर फिरणाऱ्या खऱ्याखोट्या बातम्यांमुळे दंगली पेटलेल्या आपण अनुभवले आहे. ही एक मोठी धोक्याची घंटा आहे. वाचकवर्ग आता पत्रकारांवर अवलंबून नाही, तो त्याचे स्वतःचे माध्यम तयार करु पाहतोय.

 

व्हॉटस्अप वरील विविध ग्रुप तेच दर्शवितात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी, नव्या वाचकांची नस जाणून घेता आली पाहिजे. तंत्रज्ञानामुळे बातम्या त्वरित प्रसारित करता येतील, पण विेश्वासार्हतेचा शिक्का हा फक्त आणि फक्त आपली कौशल्ये, अभ्यास, प्रामाणिकता आणि समाजातील व्यवहार यांतूनच मिळू शकतो. त्यासाठी कैक वर्षे जावी लागतात. अजून तरी विश्वासार्हता डाऊनलोड करता येत नाही. आपले मोबाईल-वाचन कमी करुन लेखन-कौशल्य वाढवणे, आपले लेखन-कौशल्य वाढविण्यासाठी पुस्तकांचे वाचन अधिकाधिक करणे, पुस्तकांचे वाचन केल्याने मनातील विचारांचा परिघ रुंदावतो. आपल्या गावात लहान मुले मोबाईल उत्तम वापरतात, याचे कौतुक स्वाभाविक आहे…पण आपण ज्यावर पोसलो गेलो, त्या वाचनसंस्कृतीचे माहेर असणाऱ्या ग्रंथालयाची अवस्था आज काय आहे, या प्रश्नाच्या उत्तरामध्येच इतर अनेक उत्तरे दडलेली आहेत. म्हणून, वर्तमानाला कवेत घेऊनच भविष्यवेधी राहावे लागेल, असे मला वेब मिडियात असतानाही आवर्जून नमूद करावेसे वाटते.

 

अखेरीस, एक सांगावेसे वाटते, ज्याप्रमाणे आपण कलाकार, खेळाडू, व्यावसायिक यांच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडतो, त्याचप्रमाणे, आपल्याविषयी अन्य कोणी (खराखुरा) लेखाजोखा मांडायला गेले, तर काय लिहिले जावे…..हे ठरवणे, आपल्याच हाती आहे. त्यातील शब्द न् शब्द आपण ठरवू शकतो. आपल्या कार्यातून!

(लेखक मुक्त पत्रकार असून नवमाध्यमांचे अभ्यासक आहेत.)

]]>
http://mediacura.com/blog/2018/01/09/tantragyan/feed/ 0
ग्रामीण पत्रकारिताः संकटे आणि संधी http://mediacura.com/blog/2018/01/09/graminpatrakaratia/ http://mediacura.com/blog/2018/01/09/graminpatrakaratia/#respond Tue, 09 Jan 2018 07:03:47 +0000 http://mediacura.com/blog/?p=161 सुनील चव्हाण

संचालक, फ्रेंड्स ऑफ फार्मर्स, पुणे

 

भारत हा विशाल लोकसंख्या असलेला जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. देशातील %0 टक्क्यांहून अधिक जनता खेड्यांमध्ये वास्तव्य करते. शेती हाच अजूनही येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. एकेकाळी स्वच्छ, स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर असलेली खेडी आज विपन्नावस्थेत आहेत. महाराष्ट्रही याला अपवाद नाही. त्यामुळेच वेगाने शहरीकरण होत आहे. खेडी ओस पडत आहेत. खेड्यातील जनताही एकाकी पडू लागली आहे. या प्रश्नाकडे पत्रकारितेच्या नजरेतून पाहण्याचा माझ्या लेखाचा उद्देश आहे. ग्रामीण पत्रकारितेची स्थिती आज अतिशय दयनीय झाली आहे. बोटावर मोजण्याइतकी जिल्हा आणि तालुका वृत्तपत्रे सोडली तर मुद्रीत माध्यमांची अवस्था बिकट आहे. त्यामुळेच या भागात राहून या क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-यांना ही स्थिती विचार करायला लावणारी आहे. मात्र संकटात मोठी संधी असते.

इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आरएनएस) आकडेवारीनुसार देशात 62 हजारांहून अधिक नियतकालिके आहेत. ज्यातील 90 टक्के म्हणजे सुमारे 55 हजार नियतकालिके स्थानिक भाषेत प्रसिद्ध होतात. यापैकी 50 हजार नियतकालिकांचा खप 10 हजारांहून कमी आहे. बहुतेक नियतकालिके तोट्यात आहेत. शुद्ध स्थानिक बातम्यांमुळे वाचकांना ही नियतकालिके आवडतात. या दैनिकांमध्ये काम करणारे पत्रकार उच्चशिक्षित ऩसतात, हे स्वाभाविक आहे. कारण उच्चशिक्षितांना आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नाही.

 

देशातील सव्वाशे कोटी लोकसंख्येला दोन वेळचा अन्नपुरवठा करणा-या ग्रामीण जनतेची लाइफस्टाइल आपल्या माध्यमांसाठी दुय्यम ठरत आहे. शहरी बनलेल्या वृत्तपत्रांमध्ये पेज-थ्री आणि पेड न्यूज संस्कृतीने धुमाकूळ घातला आहे. काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा माध्यमांमध्ये प्रवेश झाला. या माध्यमांनी पत्रकारिता हादरवून सोडली. आता सोशल मीडियाचा बोलबाला आहे. ही स्थित्यंतरे होत असताना सनसनाटीपणासाठी ग्रामीण क्षेत्राचा वापर झाला. ‘पीपली लाइव्ह’ हा चित्रपट त्याचे उत्तम उदाहरण आहे. या स्थित्यंतरात देशाचा आत्मा आणि खरा भारत समजला जाणारा ग्रामीण भाग उपेक्षेचाच धनी आहे. ग्रामीण भागातील एखाद-दुसरी मोठी घटना बातमी म्हणून राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होते. (पुणे जिल्ह्यात माळीण नावाचे अख्खे गाव पावसाळ्यात गाडले गेले. दोनच दिवसांत माध्यमांनी ही बातमी गुंडाळली. माळीणची आज काय स्थिती आहे, आहे कुणाला ठाऊक?) शेकडो बातम्या आहेत की त्या गावच्या वेशीवरच मारल्या जातात. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारा पत्रकारितेचा विस्तार आज शहरे आणि महानगरांमध्येच केंद्रीत होऊ लागला आहे. या क्षेत्रात येणारे पत्रकारही ग्रामीण भागाऐवजी शहरांना प्राधान्य देतात. अगदीच मजबूर माणसे खेड्यांत आहेत. हे वास्तव आहे. त्यात या पत्रकारांची चूक आहे, असेही नाही. चांगले शिक्षण घेऊन त्याचा योग्य मोबदला मिळत नसेल तर या क्षेत्रात चांगली माणसं राहाण्याची अपेक्षा करणे गैर आहे. सध्याचा जमाना कंत्राटी कामगारांचा आहे. मोठ्या शहरांत प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये उच्चशिक्षित पत्रकार कंत्राटी आहेत. त्यांना पत्रकारितेशिवाय व्यवसायवृद्धीतही हातभार लावणे आवश्यक असते. ग्रामीण भागात याला तर पर्यायच नाही. पत्रकारितेचा व्यवसाय हा आता धर्म वगैरे राहिलेला नसून तो अन्य व्यवसायांप्रमाणे एक व्यवसाय असून धंद्यासाठी (होत असलेल्या) सर्व लांड्या-लबाड्या या क्षेत्रातही होत आहेत. गुन्हेगारी, भूत-प्रेतांच्या कहाण्या, सिनेमाची कचकडी दुनिया यासाठी सर्व माध्यमांमध्ये भरपूर जागा आणि वेळ आहे. दोन वेळच्या अन्नासाठी मौताज असलेल्या ग्रामीण जनतेच्या आवाजाला मात्र अतिशय क्षीण प्रसिद्धी मिळते.

 

या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात काम करणा-या पत्रकारांपुढे आस्तित्वाचा आणि स्वत्व टिकविण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. शहरी पत्रकारितेच्या तुलनेत ग्रामीण पत्रकारिता भयंकर कठीण आहे. अनेक स्थानिक हितसंबंध सांभाळून पत्रकारिता करावी लागते. कारण प्रश्न असतो कुटुंबाच्या आणि स्वतःच्या सुरक्षेचा. यामुळेच ही पत्रकारिता विशिष्ट चौकटीत अडकली आहे. भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रसिद्ध होतात. मात्र त्याचा पाठपुरावा तड लागेपर्यंत होत नाही. राजकीय पुढा-यांना धमक्यांना (आणि आमिषाला) बातमीदार सतत बळी पडतात.

 

अमेरिकेत रूडी एवरामसन ग्रामीण पत्रकारितेचा जनक समजला जातो. ‘रुरल जर्नालिझम’ नावाची संस्था त्याने स्थापन केली. ग्रामीण पत्रकारांचे राष्ट्रीय संमेलनही त्याने भरवले होते. ग्रामीण पत्रकारांचा तो रोल मॉडेल होता. बातमीदारीच्या माध्यमातून जन्मभर जनतेची सेवा त्याने केली. त्याने स्वतःला कधीही महत्व दिले नाही. आपल्या देशातही ‘हिंदू’ या दैनिकाचे पी साईनाथ नामक पत्रकार आहेत. ग्रामीण पत्रकारितेने आदर्श घ्यावे असे हे व्यक्तिमत्व आहे. देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न त्यांनीच जगापुढे आणला. त्यांची अस्सल ग्रामीण वार्तापत्रे समस्यांच्या मुळापर्यंत भिडणारी असतात. ग्रामीण भारताविषयी त्यांनी आजवर 84 अहवाल लिहिले आहेत. ‘Everybody loves a good Draught’ सहीं हे त्यांचे अतिशय गाजलेले पुस्तक. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ असे त्याचे मराठीत भाषांतरही प्रसिद्ध झाले आहे. साईनाथ यांना ग्रामीण पत्रकारितेबद्दल मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 

साईनाथ यांना डावलून ग्रामीण भागाची धोरणे अंतिम रूप घेत नाहीत. ही ताकद आहे त्यांच्या ग्रामीण पत्रकारितेची. वर्षातील 280 दिवस साईनाथ खेड्यांमध्ये असतात. तेथील वास्तवाला भिडण्यासाठी! आपली काय स्थिती आहे? ग्रामीण पत्रकारितेत असणारे किती जण आज साईनाथ यांचे अनुकरण करतील? आपण पत्रकारिता ग्रामीण भगात करू मात्र वर्षाचे 280 दिवस शहरांत राहून! लोकसत्तेचे संपादक असताना माधव गडकरी यांनी असंख्य प्रश्न आपल्या लेखणीच्या बळावर सोडून दाखवले. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

 

आपल्या कार्यक्षेत्राचा इतिहास, भूगोल, आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रांचा आवाका असल्याशिवाय ग्रामीण पत्रकारिता शक्य नाही. प्रश्नांना भिडण्यासाठी प्रश्न पचविण्याची ताकद आहे का, ते तपासले पाहिजे. ग्रामीण भागात मुख्यत्वे कृषी, शिक्षण, आरोग्य, रीतीरिवाज, भेदभाव, गरीबी, कुपोषण, जंगलांवरील अतिक्रमण, खनिज संपत्तीचा ऱ्हास आणि भ्रष्टाचार यांनी ग्रासले आहे. शेतीचे प्रश्न नेमके काय आहेत, हे अभ्यासाशिवाय कुणालाही सांगता येत नाही. त्यासाठी पिकांची लागवड, बियाण्यांच्या जाती, खते, अनुदाने या संबंधित विषयांचा अभ्यास करून भिडले पाहिजे. शेती क्षेत्रासाठी जाहीर होणारी पॅकेजेस नेमकी प्रत्यक्षात कशी साकारतात, आजवरच्या पॅकेजची अंमलबजावणी कशी झाली, याचा अभ्यास फार थोड्यांचा असतो. आपण समस्यांना खरेच भिडतो का, हा प्रश्न स्वतःलाच विचारायला पाहिजे. प्रश्नांचे लचके तोडून उथळपणे तुकड्या-तुकड्यांत जनतेपुढे फेकून काहीही साध्य होणार नाही. आपण मांडलेल्या प्रत्येक समस्येची तड लागलीच पाहिजे, असे प्रत्येकाने ठरवले तर प्रश्न हळूहळू संपतील. प्रत्येक विषय आपल्या माध्यमातून प्रसिद्धी देऊनच हाताळला पाहिजे, असे नाही. आपले वजन वापरून सामाजिक सेवेच्या बांधिलकीतून अनेक प्रश्न आपण आपल्या पातळीवर सोडवू शकतो. त्याचे श्रेय मिळो ना मिळो.

 

जग अतिशय वेगवान झाले आहे. सोशल मीडियामुळे माहितीचा स्फोट होऊन तुफानी वेगाने ती सार्वत्रिक होत आहे. अशा काळात वेगळेपण सिद्ध करण्यासाठी ग्रामीण पत्रकारांनी स्वतःला तपासले पाहिजे. अपडेट राहिले पाहिजे. अभ्यासू वृत्ती वाचनातून वाढविता येईल. इंग्रजीचे ज्ञान असलेच पाहिजे. ही जगाची भाषा आहे. ऐकीव माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहचविण्यात अर्थ नाही. त्याची स्वतः अभ्यास करून नवी मांडणी असावी. पत्रकार परिषदांत जुजबी आणि बिनकामाचे प्रश्न विचारण्याऐवजी अभ्यास करुन गेलात की रोज एक नवी बातमी मिळेल. माहिती अधिकार कायद्याचे शस्त्र आपल्या हाती आहे. त्या शस्त्राचा वापर जनतेसाठी खूप परिणामकारपणे करता येऊ शकतो. पत्रकारिता हा ब्लॅकमेलींगचा धंदा नाही. ते दुधारी शस्त्र आहे. कधी आपल्यावर उलटेल सांगता येत नाही.

 

(लेखक मुक्त पत्रकार असून महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी मासिकाचे संपादकीय सल्लागार आहेत)

]]>
http://mediacura.com/blog/2018/01/09/graminpatrakaratia/feed/ 0
बातमीदारी: एक जबाबदारी http://mediacura.com/blog/2018/01/09/batmidarekjababdari/ http://mediacura.com/blog/2018/01/09/batmidarekjababdari/#respond Tue, 09 Jan 2018 06:29:30 +0000 http://mediacura.com/blog/?p=157 रणजित खंदारे

वृत्त संपादक सकाळ, औरंगाबाद

 

वर्तमानपत्र असो किंवा दूरचित्रवाणी, कोणत्याही प्रसारमाध्यमाचा मुख्य कणा असतो तो बातमीदार (वार्ताहर). समाजात मिळणाऱ्या मानसन्मानाबरोबरच बातमीदारीचा दुसरा अर्थ जबाबदारी आहे, याचे भान बातमीदारास असणे गरजेचे आहे. बातमीदाराने पाठविलेल्या बातमीतील माहिती अंतिम समजून ती प्रसिद्ध केली जाते.

 

त्यामुळे एखादी महत्वाची बातमी आपणास समजली की आपण प्रथम तिची खातरजमा केली पाहिजे.

खात्री झाल्याबरोबर आपल्या वर्तमानपत्राचे जिल्हा कार्यालय, आवृत्तीचे काम पाहणाऱ्या उपसंपादकांना ती कळवली पाहिजे. राज्यपातळीवरील महत्वाचा विषय असेल तर वृत्तसंपादक किंवा संपादकांशी त्याविषयी बोलले पाहिजे. त्यांच्याशी चर्चा करताना बातमीचे आणखी काही पैलू समोर येतात. त्यामुळे आपली बातमी परिपूर्ण होते. एखाद्यावेळी बातमी महत्वाची असते; मात्र खात्री होत नाही किंवा कोणी अधिकृतपणे बोलण्यास तयार नसते.

 

अशावेळीही आपण वरिष्ठांशी बोललो तर आणखी कोणाकडून खात्री करता येऊ शकते का किंवा अशा परिस्थितीत ती बातमी कशी लिहायची, याबाबत त्यांच्याकडून सूचना मिळू शकतात.

 

आपण संपर्काच्या क्षेत्रात काम करतो. त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांशी आपला जेवढा संपर्क तेवढे आपले माहितीचे स्रोत (सोर्स) अधिक असतात. केवळ अधिका-यांशी किंवा पुढा-यांशी संपर्क ठेवला म्हणजे आपल्याला सर्व माहिती मिळू शकते, असे समजू नये. त्यांच्याएवढेच अगदी चतुर्थश्रेणी कर्मचा-यांपर्यंतचे सर्व कर्मचारी, गावपातळीपर्यंतचे कार्यकर्तेही महत्वाचे असतात. याबरोबरच उद्योजक, व्यापारी, डॉक्टर्स, वकील, विविध विषयांतील तज्ज्ञ मंडळी, संघटनांचे पदाधिकारी आदींशी आपण नेहमी त्यांच्या क्षेत्रातील विषयांवर चर्चा केली पाहिजे. त्यामुळे त्या त्या क्षेत्रात काय चालले आहे, हे आपणास माहिती होईल व त्या क्षेत्रातील बातमी लिहिताना आपणास अडचण येणार नाही. जिल्हा आणि तालुका पातळीवरील बातमीदारास केव्हा, कोणत्या विषयावर बातमी लिहावी लागेल हे सांगता येत नाही. या संपर्काचा फायदा अशा वेळी होईल. डिझेल, पेट्रोलचे भाव कमी- जास्त झाल्यास त्याचा ग्रामीण अर्थकारणावर काय परिणाम होऊ शकतो किंवा कांदा, बटाट्याचे उत्पादन घटल्यानंतर सरकारला त्याला कसे तोंड द्यावे लागते हे आपणास माहीत असायला हवे.

 

पूर्वी माहिती मिळविण्राची साधने तुटपुंजी होती. त्यामुळे लोकांना वर्तमानपत्र किंवा आकाशवाणीवर अवलंबून राहावे लागत असे. 6. आता संपर्काची साधने एवढी वाढली आहेत की, एखादी घटना घडल्यानंतर ती काही सेकंदांत जगभर पसरू शकते. इंटरनेट, दूरचित्रवाणी, सोशल मीडियामुळे माहितीच्या बाबतीत तर जग आता एक खेडे झाले आहे, असे म्हटले जाते. एखादी बातमी दिवसभर टीव्हीवर दाखवल्यानंतर वाचकाने तीच माहिती वर्तमानपत्रातून का वाचावी, असा प्रश्न आपणास पडला पाहिजे. म्हणजे आपण त्या घटनेची अशी बाजू किंवा पैलू शोधला पाहिजे की ज्यामुळे वाचकाला दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळे वाचण्यास मिळेल.

 

बातमी लिहिताना घ्यावयाची काळजी

बातमी परिपूर्ण होण्यासाठी ज्या सहा प्रश्नांची उत्तरे बातमीत असली पाहिजेत ते प्रश्न असे

1) घटना कोठे घडली? 2) कशी घडली? 3) केव्हा घडली? 4) काय घडले? 5) का घडली? 6) कोणाकडून घडली? बातमी लिहिताना ती किती वाचकांच्या उपयुक्ततेची आहे? याचा विचार करावा व त्यानुसार तिची शब्दसंख्या आपणच निश्चित करावी.

उदा. गावात चार दिवस पाणी येणार नाही ही बातमी आणि एखाद्या व्यक्तीला पीएचडी मिळाली, ही बातमी समोर ठेवली तर यातील कोणती बातमी सर्वाधिक वाचकांच्या उपयोगी पडणारी आहे. हे आपण ठरवू शकतो. आपण अनेकवेळा कोणतीही बातमी दोनशे ते पाचशे शब्दांची लिहित असतो. मात्र दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध झाल्यानंतर लक्षात येते की ती बातमीतील 50 ते %0 टक्के मजकूर कमी केलेला आहे. त्यामुळे आपण पाठवलेली बातमी आणि प्रसिद्ध झालेली बातमी समोर ठेऊन तुलना केली तर कोणते शब्द किंवा कोणता मजकूर कमी केला हे लक्षात येईल व पुन्हा त्याच स्वरूपाची बातमी लिहिताना अनावश्यक बाबी कमी करून बातमी लिहिता येईल. या पद्धतीने विचार करून बातमी पाठवली तर आपला भ्रमनिरास होणार नाही.

 

अपघाताची बातमी लिहिताना ऐकीव माहितीच्या आधारे लिहू नये. शक्यतो अपघातस्थळी स्वतः गेल्यास अनेक वेगळे मुद्दे येऊ शकतात. अपघात का झाला, तो टळला असता का? पोलिस कधी पोचले? प्रथम कोणी मदत केली? किंवा मदत वेळेवर न मिळाल्याने मृतांचा आकडा वाढला का? आदी माहिती घटनास्थळी गेल्यानंतरच मिळू शकते आणि तेच आपल्या बातमीतील वेगळेपण ठरू शकते. अपघातातील मृतांची संख्या लिहिताना पोलिस किंवा रुग्णालयाकडून मिळालेलाच आकडा लिहावा. ऐकीव माहितीवर संख्या देण्याचा मोह टाळावा.

 

गुन्हेगारीच्या बातमीत आरोपीला संशयित आरोपी असाच शब्द वापरावा; कारण जोपर्यंत त्याच्यावर न्यायालयात आरोप किंवा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो संशयितच असतो. न्यायालयाच्या निकालाची बातमी देताना बातमीदाराने उतावीळपणा टाळून काही भान ठेवणे आवश्यक आहे. 7. जोपर्यंत न्यायमूर्ती, न्यायाधीश यांनी दिलेल्या निकालाची प्रत हाती पडत नाही तोपर्यंत बातमी देण्याचा मोह टाळावा. चोरी, दरोडा हे शब्द केव्हा वापरावेत हे त्या प्रकरणात कोणते कलम लावले आहे त्यावर अवलंबून असते. त्यामुळे कोणते कलम केव्हा लावले जाते किंवा कोणते कलम लावले आहे त्यावरून तो कोणता गुन्हा आहे हे पोलिस अधिका-यांकडून किंवा वकिलांकडून समजावून घेतले पाहिजे.

 

(उदा. पाचपेक्षा अधिक जणांनी मारहाण करून लुटले असेल तर तो दरोडा ठरतो.) गुन्हेगाराने वापरलेल्या वाहनाच्या मालकाचे नाव खात्री करूनच लिहावे. चोरट्यांनी व्यापाराची गाडी वापरली अशी चर्चा असते. प्रत्यक्षात मात्र ती गाडी त्याच्या घरातील दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर नोंदवलेली असते. पोलिसांकडून मालकाची खात्री करून योग्य संदर्भांसह गाडीमालकाचा उल्लेख करावा.

 

गुन्हेगार जर अल्पवयीनन असेल तर त्याचे नाव बातमीत घेऊ नये. बलात्कार, विनयभंगाच्या बातमीमध्ये संबंधित महिलेचे, मुलीचे नाव प्रसिद्ध करू नये.

 

आरोप – प्रत्यारोपांच्या बातम्यांमध्ये कोणी कोणाची बदनामी करण्याच्या उद्देशाने तर आरोप करत नाही ना? याची खात्री करावी. त्याबरोबर ज्याच्यावर आरोप आहेत त्याचे म्हणणे शक्यतो त्याच दिवशी त्या बातमीसोबत द्यावे. भ्रष्टाचाराच्या आरोपात तर आपल्याकडे सबळ पुरावे असतील तरच थेट त्या व्यक्तीचे नाव घ्यावे. पुरावे नसतील मात्र खात्री असेल तर कोणाचेही नाव न घेता बातमी लिहावी व संबंधित खात्रीच्या वरिष्ठ अधिका-याचे किंवा संस्थेच्या पदाधिका-याचे म्हणणे बातमीत घ्यावे. अनेकवेळा कोणाला तरी बदनाम करण्यासाठी अशा बातम्या पुरविल्या जात असतात, याचे बातमीदाराला भान असले पाहिजे.

 

पावसाळ्यात पावसाची बातमी लिहिताना पाऊस मोजताना कोणते परिमाण वापरतात, तत्याच्या नोंदी कोठे कोठे केल्या जातात, याची माहिती बातमीदारास असली पाहिजे. अतिवृष्टी म्हणजे काय? धरणाचे पाणलोट क्षेत्र, लाभक्षेत्र म्हणजे काय? धरणातील साठा, धरणात येण्याऱ्या पाण्याचा वेग, धरणातून सोडले जाणारे पाणी मोजण्यासाठी तसेच भूकंप मोजण्यासाठी कोणती एकके वापरली जातात, हे सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून समजावून घेतले पाहिजे. बातमीदाराने हवामान, पर्जन्यमानाची आकडेवारी वेळच्या वेळी द्यावी.

 

मोठ्या नेत्यांच्या, तसेच साहित्यिकांच्या सभा-समारंभांना स्वतः उपस्थित राहूनच मग वार्तांकन करायला हवे. त्याचबरोबर वक्त्यांच्या बोलण्यामागे नक्की हेतू कोणता, हेही त्यांच्या देहबोलीतून, आवाजातील चढ- उतारावरून लक्षात येऊ शकते. अनेकवेळा ही मंडळी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर थेट मतप्रदर्शन न करता मिश्कीलपणे किंवा उपरोधिकपणे टिप्पणी करीत असतात.  त्यावेळी त्यांच्या चेह-यावरील हावभाव, हातवारे बरेच काही बोलून जात असतात. त्यावरून त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळणे सोपे जाते.

 

अनेकवेळा लोक आपल्याकडे विविध मागण्यांची पत्रके घेऊन येतात, त्यात त्यांनी त्यांच्या हितसंबंधाचीच कैफियत मांडलेली असते. मात्र अनेकवेळा ती मागणी किंवा तक्रारीच्या खोलात आपण गेलोत तर ती समाजातील मोठ्या गटाशी निगडीत असल्याचे निदर्शनास येते व ती बातमी तालुका, जिल्हा किंवा राज्यस्तरावरील होऊ शकते. त्यामुळे पत्रकातही बातमी दडलेली असते म्हटले जाते.

 

सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येकाच्या तोंडी सोशल मिडियाचीच चर्चा असते. या मिडियाचा फायदा आपण घेला पाहिजे मात्र, त्याच्यावरील माहितीची किंवा छायाचित्रांची खात्री करूनच ती उपयोगात आणावीत. छाराचित्रांमध्ये अनेकवेळा जोडतोड (मिक्सिंग) करणे तांत्रिक दृष्टीने सोपे झाले आहे, तेंव्हा मिळालेले छायाचित्र अस्सल आहे ना याची खात्री करून घ्यावी. आता सर्वच वर्तमानपत्र सोशल मिडियाचा वापर करत आहेत. आपणही त्यासाठी तयार असले पाहिजे.

 

जातीय हिंसाचार, दंगलींचे वार्तांकन करताना संयम राखणे गरजेचे आहे. या बातम्या अतिशय संतुलित असल्या पाहिजेत. आपल्या बातमीतून घटनेची माहितीच पोचली पाहिजे, आपल्या बातमीमुळे ती दंगल भडकेल अशी तिची शब्दरचना असता कामा नये. अशा बातम्या लिहिताना तारतम्य बाळगणे महत्वाचे असते.

 

बातमीत लिहिलेली नावे पूर्ण असावीत. अनेकवेळा श्री. पाटील, श्री. देशमुख, श्री. जोशी अशी अर्धवट नावे वापरली जातात. अधिकारी, पदाधिकारी यांची नावे लिहितानाही मागे पद व नंतर केवळ आडनाव असे लिहिलेले असते; हे टाळावे. एखाद्या व्यक्तीचे नाव माहिती नसेल तर केवळ त्याचे आडनाव लिहिण्याचा मोह टाळावा.

एकाच बातमीत एखाद्या व्यक्तीचे नाव सर्वत्र सारखेच येईल हेही पाहावे. विशेषतः निधन, गुन्हेगारीच्या बातम्यांमध्ये नावे चुकल्यास गडबड होण्याची शक्यता असते.

 

छोटी वाटणारी बातमीही मोठी होऊ शकते. एखादी घटना प्रथमतः अगदी छोटी वाटत असते. त्यामुळे आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो, मात्र, नंतर तीच बातमी राज्यभर गाजते. त्यामुळे आपण कोणत्याही घटनेकडे दुर्लक्ष करू नये.

 

भाषेचे व्याकरण, शुद्धलेखन उत्तम असावे, शब्दांची मर्यादा पाळली तर बातम्या प्रसिद्ध होण्याचे प्रमाण वाढते. प्रत्येक 10 वर्तमानपत्राची स्वतंत्र भाषाशैली असते. ती आपण आत्मसात केली पाहिजे. आपली बातमी पाठविण्यापूर्वी ती आपणच दोनवेळा वाचावी, एवढेच नव्हे तर छापून आलेली बातमीही वाचावी, म्हणजे नेमके काय संपादन (एडिटिंग) झाले ते लक्षात येईल व पुढीलवेळी आपल्या कॉपीत सुधारणा करता रेईल. एक छायाचित्र हजार शब्दांचे काम करत असते, असे म्हणतात. ते खरेच आहे. त्यामुळे छायाचित्रे पाठवताना किंवा काढताना ती बोलकी असली पाहिजेत. फोटोग्राफरकडे पाहणारे चेहरे असलेली छायाचित्रे पाठविणे टाळावे.

 

वैयक्तिक लिखाणातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्ररत्न करावा. त्यासाठी सखोल वाचन आवश्यक आहे. किमान एका तरी विषयात तज्ज्ञता मिळविण्याचा प्रयत्न करावा. बातमीदार हा सर्वज्ञ असतो असा वाचकाचा समज असतो.

त्यामुळे आपणास प्रत्येक विषयातील किमान माहिती असणे आवश्यक आहे.

 

बातमीदाराकडे त्या दैनिकाचाच नव्हे तर समाजाचा प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते. त्यामुळे या प्रतिमेला धक्का बसेल असे कोणतेही वर्तन असू नये. आपल्या बातम्यांमध्ये समाजाचे प्रतिबिंब असेल, बातमीत सखोल व अभ्यासपूर्ण माहिती देण्यावर आपला भर असेल तर आपली विश्वासार्हता वाढते. वर्तमानपत्राचीही विश्वासार्हता त्याबरोबर वाढत असते. अनेकजण अधिकारी किंवा पुढा-यांचे प्रसिद्धीप्रमुख आहेत अशा पद्धतीने वागत असतात. त्यांना समाजात मान मिळत नाही. अधिकारी, पुढा-यांशी आपले संबंध आहेत म्हणून त्यांच्याविरोधात बातमी लिहिणे टाळू नये, ते चांगले असले तरी त्यांच्या अधिकाराखाली कार्यरत असलेल्या यंत्रणेतील दोषावर आपण लिहिले पाहिजेच कारण ते वाचकांच्या हितासाठी महत्वाचे असते.

]]>
http://mediacura.com/blog/2018/01/09/batmidarekjababdari/feed/ 0
योग्य व अयोग्य शब्दांची सूची http://mediacura.com/blog/2018/01/06/yogyavayogya/ http://mediacura.com/blog/2018/01/06/yogyavayogya/#respond Sat, 06 Jan 2018 13:04:29 +0000 http://mediacura.com/blog/?p=155 नेहमीच्या लेखनात येणारे अनेक शब्द कित्येकदा चुकीच्या अर्थाने वापरले जातात वा चुकीच्या पद्धतीने लिहिले जातात. पत्रकारांनी आपली भाषा बिनचूक राहील याची दक्षता घेण्याची गरज आहे, कारण वर्तमानपत्रे वाचणारा वाचक छापील शब्दांना प्रमाण मानत असतो.

अलीकडे व पलीकडे
अलीकडे व पलीकडे हे परस्परविरोधी अर्थाचे शब्द आहेत. आपल्या बोलण्या-लिहिण्यात ते नेहमी येतात. अलीकडे म्हणजे या बाजूला, पुढील बाजूला. काळासंदर्भात अलीकडेचा अर्थ हल्ली. पलीकडे म्हणजे दुसऱ्या बाजूला, मागील बाजूला. अलीकडे व पलीकडे हे शब्द अलिकडे व पलिकडे असे लिहिण्याची चूक अनेकांकडून होते. दोन्ही शब्दांत ल वर दुसरी वेलांटी द्यायची, हे लक्षात ठेवावे.

अक्रीत
असंभवनीय, उफराटे या अर्थांनी अक्रीत हा शब्द वापरला जातो. प्रतिकूल, मोफत, विपरीत, अतिशय, बेसुमार हेदेखील त्याचे अर्थ आहेत. हा शब्द चुकून आक्रित , अक्रित वा आक्रीत असा लिहिला जाण्याची शक्यता असते. या शब्दातील पहिले अक्षर आ नसून अ आहे; तसेच क्र वर दुसरी वेलांटी आहे; हे ध्यानात टेवावे. अक्रीत घेणे म्हणजे एखादी वस्तू बेसुमार किंमत देऊन विकत घेणे.

असुर
असुर म्हणजे दैत्य, राक्षस, सुर म्हणजे देव. सुर आणि असुर या दोन्ही शब्दांत सला पहिला उकार आहे. उच्चारताना ‘असूर’ अशी चूक होऊ शकते व त्यामुळे लिहितानाही ती होते; ती टाळावी. आसुरी म्हणजे राक्षसी. (उदाहरणार्थ आसुरी आनंद, आसुरी उपाय इत्यादी). त्याही शब्दात सला पहिला उकार आहे. सूर (सू दीर्घ) हा शब्द संगीतातील स्वर या अर्थी रूढ आहे.

अस्थिपंजर
अस्थि म्हणजे हाड. पंजर म्हणजे पिंजरा, सापळा. अस्थिपंजर या शब्दांची फोड अस्थि+ पंजर अशी होते. हा मूळ शब्द संस्कृत आहे. म्हणून सामासिक शब्दात तो ऱ्हस्वान्तच लिहावा. अस्थीपंजर असे लिहू नये. अस्थिपंजरचा अर्थ हाडांचा सापळा.

अहल्या
अहल्या हे नाव पुराण काळापासून प्रसिद्ध आहे. गौतम ऋषींच्या पत्नीचे नाव अहल्या होते. अ + हल्या अशी याची फोड आहे. हल्य या शब्दाचा अर्थ निंद्य. जी निंद्य नाही, ती अहल्या. या शब्दाऐवजी अहिल्या असा शब्द वापरल्याचेही तुम्हाला आढळेल. तो अपभ्रंश आहे. अहल्या हा शब्द वापरणे योग्य कसे, हे त्याच्या अर्थावरून स्पष्ट होते.

आख्यायिका
आख्यायिका म्हणजे दंतकथा; परंपरेने चालत आलेली गोष्ट. साधारणत: ऐतिहासिक आधार नसलेल्या गोष्टीला आख्यायिका म्हटले जाते. या शब्दात पहिले अक्षर अ नसून आ आहे, हे ध्यानात ठेवावे. (अख्यायिका असे लिहिणे चूक.) यातील तिसर्‍या अक्षराच्या बाबतीत चूक होऊन यिऐवजी इ हे अक्षर वापरले जाऊ शकते. (आख्याइका असे लिहिणे चूक आहे, हेही लक्षात ठेवावे.)

आगाऊ
आगाऊ हे विशेषण व क्रियाविशेषण म्हणून वापरले जाते. विशेषण म्हणून ते वापरले, तर आधीचा असा त्याचा एक अर्थ होतो आणि प्रौढी मिरविणारा वा दुढ्ढाचार्य असाही अर्थ होतो. क्रियाविशेषण म्हणून ते वापरले, तर आधी, प्रथम हे अर्थ होतात. आगाऊ हा शब्द अगाऊ असाही लिहिला जातो. अगावू वा आगावू असा तो लिहिणे मात्र चुकीचे आहे.

आग्नेय
आग्नेय हे एका दिशेचे नाव. पूर्व व दक्षिण या दिशांच्या मधील दिशा आग्नेय. या शब्दाचे पहिले अक्षर चुकून अ असे उच्चारले जाते व लिहितानाही ती चूक (अग्नेय) होऊ शकते. ती टाळण्याची काळजी घ्यावी. आग्नेय या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. अग्निपूजक, अग्निवंशज, ज्वालाग्राही आदींचा त्यात समावेश आहे. आग्नेयी या संस्कृत शब्दाचा अर्थ आग्नेय दिशा व प्रतिपदा असाही होतो.

आजीव
आजीव या शब्दाची फोड ‘आ + जीव’ अशी आहे. ‘आ’ या उपसर्गाचा ‘पर्यंत’ हा एक अर्थ आहे. आजीव म्हणजे जिवंत असेपर्यंत; म्हणजेच आयुष्यभर. आजीव सदस्य म्हणजे तहहयात सदस्य. आजीव या शब्दात पहिले अक्षर ‘आ आहे; ‘अ’ नव्हे. हा शब्द चुकून ‘अजीव’ असा लिहिला गेला, तर त्याचा अर्थ ‘निर्जीव’ असा होईल. आजीव या शब्दात ‘ज’वर दुसरी वेलांटी आहे, हेही लक्षात ठेवावे.
आतुर
आतुर या शब्दाचे अर्थ अनेक आहेत. उत्सुक, उतावीळ , उद्युक्त, व्यथित आदींचा त्यांत समावेश आहे. या शब्दात तला पहिला उकार आहे. (आतूर असे लिहिणे चूक.) आतुरता म्हणजे उत्सुकता . आतुरतामध्येही

तु र्‍हस्व आहे. चिंतातुर (चिंता + आतुर) म्हणजे चिंताग्रस्त; चिंतेने व्यथित झालेला. अर्थातुर (अर्थ + आतुर) म्हणजे पैशासाठी उत्सुक असलेला. याही शब्दांत तच्या उकारात बदल होत नाही.

 

शिलाई
‘आई’ हा मराठी प्रत्यय लागून धातुसाधित नाम तयार होते. ‘शिलाई’ या शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असते. ‘शिलाई’ या शब्दात ‘श’ला पहिली वेलांटी व दीर्घ ‘ई’ लिहावा.

पाळीव
‘ईक’ जसा मराठी प्रत्यय आहे, तसाच ‘ईव’ हाही आहे. या प्रत्ययापासूनही मराठी शब्द तयार झाले आहेत. ‘पाळीव’ हा त्यातीलच एक शब्द. हा शब्दही दीर्घच लिहावा आणखी काही उदाहरणे रेखीव, आखीव इत्यादी.

लखलखीत
‘ईत’ हा मराठी प्रत्यय लागून विशेषण तयार होते. यापासून तयार झालेले शब्द दीर्घ असतात. म्हणून ‘लखलखीत’ हा शब्दही दीर्घ असावा. ‘चकचकीत’ हेदेखील याच प्रकारचे उदाहरण आहे.

क्षणभंगुर
‘क्षणात नाश पावणारे’ हा क्षणभंगुर या विशेषणाचा शब्दश: अर्थ आहे. क्षणिक, अशाश्वत या अर्थांनी हा शब्द रुढ आहे. भंगुर या विशेषणाचा अर्थ भंगणारे, ठिसूळ असा आहे. क्षणभंगुर या शब्दात गला पहिला उकार, हे ध्यानात घ्यावे . (क्षणभंगूर असे लिहिणे चूक.) क्षणिक या विशेषणात ‘ण’वर पहिली वेलांटी, हेही लक्षात ठेवावे. (क्षणीक असे लिहिणे चूक.)

माणुसकी
‘माणूस’ हे नाम आहे. या नामाला की हा प्रत्यय लावला असता ‘माणुसकी’ हे भाववाचक नाम तयार होते. माणूस या शब्दामध्ये जरी णला दुसरा उकार असला तरी त्याचे भाववाचक नाम बनताना त्यात ण ला पहिला उकार द्यायला विसरू नये. ‘माणूसकी’ असे लिहिणे चूक आहे.

शिलारस
‘शिला’ म्हणजे पाषाण, दगडाची चीप. ‘शिलारस’ म्हणजे ज्वालामुखीतून बाहणारा गरम द्रव पदार्थ, लाव्हा. या शब्दात ‘श’ला दुसरी वेलांटी न देता पहिली द्यावी. ‘शीलारस’ असा शब्द लिहू नये.

सहस्ररश्मी
‘सहस्ररश्मी’ म्हणजे सूर्य. ‘रश्मी’ म्हणजे प्रकाश, किरण. सूर्याला सहस्र किरणे असतात म्हणून त्याला सहस्ररश्मी म्हणतात. या शब्दात ‘स’ ला ‘र जोडावा व ‘श’ला ‘म’ जोडावा. ‘स’ला ‘त्र’ जोडण्याची चूक होऊ शकते.

स्तुतिपाठक
‘स्तुति’ म्हणजे प्रशंसा, स्तोत्र. स्तुतिपाठक म्हणजे खुशामत करणारा. ‘स्तुति’ हा मूळ शब्द संस्कृत आहे. यात ‘त’ला पहिली वेलांटी व ‘स्त’ला पहिला उकार आहे. ‘स्तुती’ शब्द लिहिताना मात्र ‘त’ ला दुसरी वेलांटी द्यावी. कारण मराठीत अंत्य अक्षर दीर्घ असते.

सुवाच्य
अक्षर सुवाच्य असावे, असे शिक्षक नेहमी सांगतात. सुवाच्य म्हणजे सहज वाचता येईल असे. यालाच स्वच्छ अक्षर असेही म्हणतात. सु + वाच्य अशी या शब्दाची फोड आहे. वाच्य, वाचन, वाचक हे शब्द एकमेकांशी निगडित आहेत. वाच्य या शब्दाचा मूळ अर्थ बोलण्यास किंवा सांगण्यास योग्य असा आहे. सुवाच्य हा शब्द अनेक जण सुवाच्च असा लिहितात; ती चूक टाळावी.

अग्रिम
अग्रिम हा शब्द इंग्रजीतील ऍडव्हान्स शब्दाला प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. अग्रिम हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. अग्र या शब्दापासून तो बनला आहे. अग्रच्या अर्थांमध्ये पहिला, पुढे आलेला आदींचा समावेश आहे. ‘आधीचा’, पहिला, श्रेष्ठ, प्रथम पिकलेला, हे अग्रिमचे अर्थ आहेत. अग्रिम वेतन म्हणजे आगाऊ दिलेले वेतन. रक्कम या संदर्भातच या शब्दाचा प्रामुख्याने वापर होतो.

 

 

आगंतुक
अचानक आलेल्या, विशेषत: भोजनाच्या वेळी न बोलावता आलेल्या पाहुण्याच्या बाबतीत आगंतुक हा शब्द वापरला जातो. बाहेरचा, वाट चुकलेला, आकस्मिक असेही य शब्दाचे अर्थ आहेत. या शब्दातील पहिली तिन्ही अक्षरे नीट लक्षात ठेवावीत; म्हणजे हा शब्द अगांतुक, आगांतूक, आगंतूक असा लिहिण्याची चूक होणार नाही. आगंतुक खर्च म्हणजे अनपेक्षित खर्च. आगंतुक लाभ म्हणजे अचानक झालेला लाभ.

आकस्मिक
अचानक, अकल्पित, एकाएकी, अनपेक्षित हे आकस्मिक या शब्दाचे अर्थ आहेत. अकस्मात हादेखील शब्द त्याच अर्थांनी वापरला जातो. त्यात पहिले अक्षर अ आहे; मात्र आकस्मिकमध्ये पहिले अक्षर ‘आ’ आहे, हे ध्यानात ठेवावे. आकस्मिकमध्ये स्मवर पहिली वेलांटी आहे. (आकस्मीक असे लिहिणे चूक.) आकस्मिक ऐवजी आकस्मित असे लिहिण्याची चूक होऊ शकते, तीही टाळावी.
अजित
अजित म्हणजे अजिंक्य. जित म्हणजे पराभूत; जिंकला गेलेला. त्याच्या उलट अर्थांचा शब्द अजित(अ + जित). विष्णू, शिव, बुद्ध असेही ‘अजित’चे अर्थ आहेत. या शब्दात ‘ज’वर पहिली वेलांटी आहे. चुकून ती दुसरी दिली गेली, तर अर्थ बदलतो. ‘अजीत’चा अर्थ ‘न कोमेजलेले’ असा आहे. अपराजित याही शब्दाचा अर्थ अजिंक्य. ‘अपराजित’मध्येही जवर पहिली वेलांटी आहे.

अत्युच्च
अतिउच्च अशी अत्युच्च या शब्दाची फोड आहे. दोन्ही शब्द संस्कृतमधून आले आहेत. फार, अधिक, जास्त, अतिशय हे अतिचे अर्थ आहेत. उच्च म्हणजे उंच. अत्युच्चमधील दोन्ही जोडाक्षरे नीट लक्षात ठेवावीत. हा शब्द अत्त्युच्च असा लिहिणे चुकीचे आहे. (तची दुरुक्ती नाही.) अखेरचे अक्षर च्य असे लिहिण्याची चूक (अत्युच्य) टाळावी. काहींच्या हातून दोन्ही चुका (अत्त्युच्य) होऊ शकतात. शब्दाची फोड लक्षात घ्यावी.

अतीत
अतीत म्हणजे होऊन गेलेले, दूर गेलेले. मागे टाकणारे असाही त्याचा एक अर्थ आहे. कालातीत म्हणजे काळाला मागे टाकणारे; काळापलीकडचे. शब्दातीत म्हणजे शब्दांच्या पलीकडचे. अतीत, कालातीत, शब्दातीत या सर्व शब्दांत तवर दुसरी वेलांटी आहे हे लक्षात घ्यावे. (अतित, कालातित, शब्दातित असे लिहिणे चुकीचे.) व्यतीत हाही शब्दाचा अर्थ होऊन गेलेले असा आहे. त्याही शब्दात ती दीर्घ आहे.
आधिक्य
अधिक या विशेषणापासून आधिक्य हे भाववाचक नाम बनले आहे. अधिक म्हणजे जास्त, हे आपल्याला माहीत आहे. अतिशय, जोराचे, श्रेष्ठ हेदेखील ‘अधिक’चे अर्थ आहेत. आधिक्य म्हणजे आधिकपणा, श्रेष्ठत्व. ‘आधिक्य’मध्ये पहिले अक्षर ‘आ’ आहे; ‘अ’ नव्हे, हे ध्यानात घ्यावे. निवडणुकीच्या निकालासंदर्भात ‘मताधिक्य’ हा शब्द तुमच्या वाचनात आला असेल. ‘मत+आधिक्य’ अशी त्याची फोड आहे.

अधीक्षक
अधीक्षक या शब्दाचा खरा अर्थ देखरेख करणारा. हे सरकारी विभागांतील वा खासगी संस्थांमधील एक अधिकारपद आहे. सुपरिंटेंडंट या शब्दाला हा प्रतिशब्द आहे. अधि+ ईक्षक अशी याची फोड आहे. ईक्षक म्हणजे पाहणारा. अधिया उपसर्गाचा अर्थ वर, वरच्या बाजूस असा आहे. अधीक्षक या शब्दात ध वर दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात ठेवावे. (अधिक्षक असे लिहिणे चूक.)

अध्याहृत
अध्याहृत या शब्दाचा अर्थ गृहीत धरलेले . त्याचा उल्लेख प्रत्यक्ष केलेला नसतो; पण अर्थ समजून घेताना ते लक्षात घ्यायचे असते. हा शब्द लिहिताना त्यातील ध्या ऐवजी ध्य लिहिले जाण्याची चूक होऊ शकते. (अध्यहृत); ती टाळावी. अध्याह्रत, अध्याऋत, अध्यारूत अशाही चुका होण्याची शक्यता असते. त्या टाळण्यासाठी हृ हे अक्षर नीट लक्षात ठेवावे . या शब्दाचे पहिले अक्षर ‘आ’ नसून ‘अ’ आहे, हेही ध्यानात घ्यावे.

अनसूया
अनसूया हे नाव तुम्ही ऎकले असेल. अनुसया असाही शब्द ऎकला असेल. अनुसया हा अनसूया चा अपभ्रंश. अनसूया हा शब्द शुद्ध. तो लक्षात राहण्यासाठी त्याची फोड (अन् + असूया) लक्षात घ्यावी. यात न् आणि अ यांचा संधी होऊन न झाला आहे. अन् हा नकारार्थी उपसर्ग. असूया म्हणजे मत्सर, निंदा. अनसूया म्हणजे निर्मत्सरी, निष्कपटी. अनसूयक या विशेषणाचाही तोच अर्थ आहे.

अनिर्वचनीय
अनिर्वचनीयचा अर्थ आहे अवर्णनीय. अनिर्वाच्य असाही शब्द याच अर्थाने वापरतात. एखाद्या गोष्टीचे वर्णन शब्दांत करणे अवघड असते तेव्हा केवळ अवर्णनीय असे म्हटले जाते. हा शब्द लिहिताना अनिरवचनीय, अनीर्वचनीय, अर्निवचनीय असा चुकीचा लिहिला जाण्याची शक्यता असते. नला पहिली वेलांटी व रफार ववरच द्यावा.

]]>
http://mediacura.com/blog/2018/01/06/yogyavayogya/feed/ 0
पत्रकार आणि साहित्य : आहे मनोहारी तरी… http://mediacura.com/blog/2018/01/06/patkaransahitya/ http://mediacura.com/blog/2018/01/06/patkaransahitya/#respond Sat, 06 Jan 2018 12:51:37 +0000 http://mediacura.com/blog/?p=153 यमाजी मालकर

पत्रकारिता आणि साहित्य याची चर्चा करणे, पत्रकारांच्या दृष्टीने मनोहारी असले तरी आता वेगळा विचार केला पाहिजे, असे मला वाटते. हे मान्य केले पाहिजे की साहित्याचा प्रवाह, वाचनसंस्कृतीला चालना देण्याचे काम आपल्या हातातील माध्यम किंवा वर्तमानपत्राच्या मार्फत पत्रकार नेहमीच करत आले आहेत आणि पुढेही करत राहतील. मात्र हा सर्व प्रवास दूधाची तहान ताकावर भागविण्यासारखाच राहिला आहे.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारची सक्षम व्यासपीठे साहित्य क्षेत्रात उभी राहायला हवी होती, तशी ती उभी राहिली नाहीत. त्यामुळे वर्तमानपत्रे किंवा त्यांच्या रविवार पुरवण्या यांनीच त्यांना व्यासपीठ देण्याचे प्रयत्न केले. वर्तमानपत्राच्या धबडग्यात काय होते आणि काय काय होऊ शकते, हे वेगळे सांगण्याची गरज राहिलेली नाही. एका विशिष्ट विषयाला पूर्ण न्याय मिळाला, अशी अपेक्षा वर्तमानपत्रांकडून केली जाऊ शकत नाही. त्याचे कारण असे आहे की, पत्रकार किंवा तो काम करीत असलेले ते माध्यम याचे प्राधान्यक्रम नेहमीच वेगळे राहिले आहेत. एवढेच नव्हे तर ते नेहमीच बदलते राहिले आहेत. त्यामुळेच वर्तमानपत्रांकडून साहित्य क्षेत्राला मिळणारा प्रतिसाद हा नेहमीच अपेक्षाभंग करणारा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर साहित्याने आपली इतर व्यासपीठे सुदृढ करण्याची गरज आहे.

मूळात हे लक्षात घेतले पाहिजे की पत्रकारिता आणि साहित्य यात मोठे अंतर आहे. माध्यमे ही आजच्या व्यवहारी जगाचा आरसा आहेत तर साहित्य हे जनमाणसाच्या आतील मनाचा आरसा आहे. माध्यमे ही वर्तमानाविषयी विशिष्ट किंवा तोकड्या वेळेत झालेल्या आकलनावर बोलण्याचा प्रयत्न करतात तर साहित्य ही दीर्घकालीन आणि अनुभवाच्या पातळीवर रुजेलेल्या आकलनावर होणारी निर्मिती आहे. माध्यमे जे सादर करतात, तो सामुहिक कृतीचा आविष्कार असतो आणि त्याला ते माध्यम, त्याला मिळणारा वेळ किंवा जागा, त्या माध्यमांची धोरणे अशा अनेक मर्यादा असतात. अशा मर्यादांत साहित्य निर्माणच होऊ शकत नाही. माध्यमांच्या रूपाने होणारी निर्मिती ही बहुतेक वेळा अल्पकाळ टिकणारी असते तर साहित्य निर्मिती मात्र दीर्घकाळ टिकते. अर्थात, साहित्य निर्मितीची ठिणगी पेटविण्याचे काम माध्यमे करू शकतात, पण माध्यमाच्या धबडग्यात ती निर्मिती होणे अवघड असते. कारण हा धबडगा केवळ घटनांच्या आक्रमणाचा नसतो, तो पत्रकाराच्या सेवेच्या चौकटीचाही असतो. एकप्रकारे ते सोपेविलेले काम असते, स्वीकारलेले नसते. साहित्याचा स्वीकार मात्र निर्मात्याने स्वत:हून करायचा असतो. एक महत्वाचा भेद म्हणजे माध्यमांत जगरहाटी महत्वाची ठरते आणि साहित्यात नवनवे आविष्कार महत्वाचे ठरतात. माध्यमे दररोजच्या घडामोडींच्या दृष्टीने प्रवाही आहेत, असे म्हणताच येईल. पण ती नव्या जगाचा स्वीकार करताना ती तेवढी प्रवाही असतातच, असे नाही. साहित्य आणि पत्रकारितेतील अंतर हे आणि यासारखे अनेक भेद वाढवतात, ही बाब लक्षात घेऊनच या विषयाचा विचार करावा लागेल.

आपल्याकडे अनेक साहित्यिक सुरवातीच्या काळात पत्रकार होते, त्यांना लेखनाची आवड कदाचित पत्रकारितेने लावली असेल, पण त्यांना आपले लेखन कसदार करताना पत्रकारितेपासून दूर जावे लागले, हा मुद्दाही लक्षात घेतला पाहिजे. त्याचे कारण पत्रकारीतेमुळे मानसिकतेत जे बदल होतात, ते बदल होय. उदा. पत्रकाराला प्रत्येक माहितीविषयी संशय घेण्याची सवय लागते आणि ती त्या व्यवसायाची एक प्रकारे गरजही आहे. पण त्यामुळे तो सामान्य आयुष्य जगूच शकत नाही, तो जीवनातील प्रत्येक गोष्टीविषयी साशंक होतो. जीवनाविषयी एक तर्कटपणा त्याच्या आयुष्यात काम करू लागतो. पण साहित्यिकाला असा विचार करून चालत नाही. त्याला आपले अनुभवविश्व तर समृद्ध करायचे असतेच, पण नव्या गोष्टींचा स्वीकार अधिक संवेदनशीलतेने करावयाचा असतो. पत्रकारही नव्या गोष्टींकडे पहात असतोच, पण त्याच्या व्यवसायामुळे नव्या गोष्टी त्याला इतक्या वेगाने धडकत असतात की त्या त्याच्या आयुष्यामध्ये केवळ बातमी किंवा लेख लिहिण्यापुरत्याच रहातात. अनेकदा तर असेही घडते की त्याच्या आयुष्यात ज्या बदलांची गरज असते, ते बदल तो बातमी किंवा लेखांमध्ये हिरीरीने लिहित असतो, पण जेव्हा त्या बदलांचा स्वीकार करण्याची वेळ येते, तेव्हा त्याचे लक्ष दुसऱ्या विषयाकडे वळलेले असते. दोष त्याचा नाही, पण त्याला व्यवसाय अधिक विचार करण्याची मुभाच देत नाही, असे मला वाटते. साहित्याच्या दृष्टीने पत्रकार नेहमीच काठावर बसलेला असतो, असेही म्हणता येईल.

आणखी एक गोष्ट म्हणजे कसदार साहित्याची आणि तेवढ्याच कसदार पत्रकारितेची निर्मिती होण्यासाठी जी परिस्थिती समाजात आजूबाजूला लागते, तिचा आपल्या समाजात असलेला अभाव. समाजातील दारिद्रयामुळे या दोन्ही क्षेत्रात असे काही ताण निर्माण झाले आहेत की दोन्हींचे मूळ स्वरूप आणि त्याचा आस्वाद याला आपोआपच मर्यादा आल्या आहेत. वर्तमानपत्रांचे कधीही न संपलेले आर्थिक प्रश्न हे त्याचे एक उदाहरण. आपल्या भाषेतील कथा, कविता संग्रह आणि कादंबरीच्या पहिल्या आवृती संपण्यासाठी लागलेली वर्षे, हे त्याचे दुसरे उदाहरण. आर्थिक आणि त्या अनुषंगाने आलेल्या सांस्कृतिक दारिद्र्याने या मर्यादा आणखी ठळक केल्या आहेत. गेली काही वर्षे वर्तमानपत्रे आशयाला देत असलेले महत्व किंवा मूल्य पाहिले तरी याचा खुलासा होतो. चांगल्या आशयाला चांगले मोल देण्याची क्षमता आजही वर्तमानपत्रांत आलेली नाही, यातच सर्व आले. आशयाची जेवढी चांगली आणि निरपेक्ष छाननी व्हायला हवी, तेवढी वर्तमानपत्रांत केली जात नाही. चांगले आणि पुरेसे मनुष्यबळ नसणे, हे पुन्हा दारिद्र्याचेच लक्षण होय. अशा अडचणींचा मोठा पाढा वाचावा लागेल, पण तो काही आपला उद्देश्य नाही.

अर्थात, या सर्व गोष्टींवर मात करून अनेक पत्रकारांनी साहित्य निर्मिती केली आहे आणि अनेक जण करतही आहेत. पण तो त्यांच्या वैयक्तिक क्षमतेतून झालेला आविष्कार आहे. त्यांनी या दोन्ही क्षेत्राच्या सीमारेषा ओळखल्या आणि त्यानुसार स्वत:त बदल केले. परिस्थितीवर कष्टाने मात केली. मानसिक गुलामी झुगारून दिली. मनाला तसे घडविले आणि त्यातून त्या त्या भूमिकेला ते न्याय देऊ शकले. पण ज्या अर्थाने पत्रकार आणि मराठी साहित्य अशी चर्चा आपण करत आहोत, त्या अनुषंगानेच ही मांडणी येथे केली आहे, एवढेच.

माणसाला व्यक्त व्हावे वाटणे, ही तर गरज आहे आणि त्या अर्थाने साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. पण त्याचा जीवनानंद घेणारा वर्ग आजही मर्यादित आहे. त्यामुळे समाजाच्या समृद्धीमध्ये मोठी कमतरता निर्माण झाली आहे, हे मान्य केले पाहिजे. निर्मिती आणि त्याचा आस्वाद अस्सल असावा, अशी अपेक्षा योग्य असली तरी त्यात आम्ही अशा वेगवेगळ्या कारणांनी कमी पडत आहोत. ही कमतरता काढून टाकण्याची पहिली पायरी म्हणजे तिची जाणीव होणे आणि दुसरी पायरी ती काढून टाकण्याचा प्रयत्न करणे. पत्रकारांनी आजचे बदलते जग खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा आणि तेवढेच महत्वाचे म्हणजे त्यात आपले अस्सल अस्तित्व शोधण्यास सुरवात केली तर हा बदल शक्य आहे, असे मला वाटते.

ymalkar@gmail.com

]]>
http://mediacura.com/blog/2018/01/06/patkaransahitya/feed/ 0
पत्रकारांसाठी नवी दशसुत्री: २०१८ http://mediacura.com/blog/2018/01/06/patrakardashsutri/ http://mediacura.com/blog/2018/01/06/patrakardashsutri/#respond Sat, 06 Jan 2018 12:36:46 +0000 http://mediacura.com/blog/?p=147 यमाजी मालकर

जग इतके प्रवाही होत चालले आहे आणि त्यातील समग्र बदलांनी इतका वेग घेतला आहे की त्यातून पत्रकारिता किंवा माध्यमे वेगळी राहूच शकत नाहीत. कारण माध्यमे ही समाजाचाच भाग आहेत. एवढेच नाही तर ते समाजाला पुढे घेऊन जाणारे इंजिन आहे, असे म्हटले जाते , त्यामुळे नव्या चांगल्या प्रवाहांचे पत्रकारांनी स्वागत केले पाहिजे. २०-२५ वर्षांपूर्वी पत्रकारिता केलेले काही पंडित हे पत्रकार समाजात कसा वेगळा आहे, माध्यमे कशी वेगळी आहेत, असे सांगण्याचा आटापिटा करत होती. मात्र त्यांनाही माहित असते की आपण रेटले तसे आग्रह आता रेटले जाणार नाहीत. मात्र आपण त्याकाळी कशी मर्दुमकी गाजवली, अशी रसभरीत वर्णन करण्याची आपल्याकडे सर्वच क्षेत्रात पद्धत पडली आहे. नव्या पिढीला आपण काहीतरी पाप करत आहोत, असे वाटावे, असे मार्गदर्शन करण्यात मागील पिढी पटाईत असते. माझे मत असे आहे की प्रत्येक पिढीला आपल्यावरील जबाबदारीची जाणीव असते आणि त्यानुसारच ती जगत असते. त्यामुळे आजच्या तरुण पत्रकारांच्या पिढीने परंपरेची फार ओझी घेवून जगण्याचे काही कारण नाही.

अनेकांना प्रथमदर्शनी हे पटणार नाही, मात्र आज ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाते त्याचा आणि माध्यमांतील दैनंदिन कामाचा फारसा संबंध राहिलेला नाही. अर्थात हे काही केवळ पत्रकारितेलाच लागू नाही. एकूणच शिक्षण प्रक्रिया आणि जीवनातील आव्हाने – यांनी केव्हाच फारकत घेतली असून आता कौशल्ये जास्त महत्वाची ठरत आहेत. वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी, रेडिओ, ऑनलाइन सोशल मिडिया आणि जनसंपर्क अशा सर्वच प्रकारच्या माध्यमात वेगवेगळी कौशल्ये लागतात. ही कौशल्ये फार जगावेगळी आहेत, असे एकेकाळी माध्यमांतील लोक म्हणत होते आणि त्यावेळी ते खरेही होते. मात्र गेल्या १५ वर्षांनी ते वेगळेपण हिरावून घेतले आहे, याचे भान आता पत्रकारांना ठेवावे लागणार आहे. आपण कोणीतरी फार वेगळे आहोत, असा जो पत्रकारांचा वावर असतो, तो पुढील काळात कमी करावा लागणार आहे.

ज्याला नाव देणेही अवघड झाले आहे, अशा या आजच्या काळाला सामोरे जाताना तरुण पत्रकारांना काय सांगावे, असा प्रश्न मला पडला तेव्हा पत्रकारांसाठी एक दशसुत्री तयार करावी, असा विचार मनात आला आणि ती मी तयार केली आहे. मला वाटते सूत्रबद्ध पद्धतीने ते सांगणे अधिक सोपे होईल. अशीच एक दशसुत्री मी १५ वर्षांपूर्वीही केली होती, मात्र आता असे लक्षात येते की ती आता जुनी झाली. तिची उपयोगिता कमी झाली. १५ वर्षांचा काळ हा फार मोठा म्हणता येणार नाही, मात्र गेल्या १५ वर्षांतील समग्र बदल पाहिले की जगाने आणि भारतीय समाजानेही मोठा प्रवास केला आहे. ही दशसुत्री त्या प्रवासाला धरून आहे. ती माझ्या अनुभवावर आणि आकलनावर आधारित आहे, त्यामुळे तिला मर्यादा असू शकतात, हे वाचकांनी लक्षात घ्यावे. शिवाय तिला मी २०१८ ची दशसुत्री म्हटले आहे, याचा अर्थ काही मुलभूत गोष्टी वगळता ती पुढील वर्षीही बदलू शकते.

  • पत्रकार हा व्यापक विचार करणारा असला पाहिजे. त्यामुळे त्याने एखाद्या घटनेचे सर्व पैलू समजून घेवून मग आपले मत तयार करण्याची दक्षता घ्यावी. विशेषतः आपल्यावर प्रभाव असणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या विचारसरणी आणि पुस्तकांच्या आहारी जावून आपण आपले मत तयार करत नाही ना, याची खात्री करून घ्यावी.
  • आजच्या काळात विषयांचे वैविध्य इतके वाढले आहे की सर्वच विषयातील थोडे थोडे कळण्याचीही शक्यता राहिलेली नाही. त्यामुळे विविध विषयात गती असणाऱ्यांची नोंद आपल्याकडे असली पाहिजे. नवा विषय समोर आला की तो त्याच्याकडून शालेय विद्यार्थ्यासारखा समजून घेतला पाहिजे.
  • भूमिका स्थानिक घ्यायची की व्यापक, असा पेच सध्या विभागीय असमतोल आणि जागतिकीकरणामुळे वाढला आहे. कारण स्थानिक घटनांवर राज्य, देश आणि जगाचा प्रभाव वाढला आहे. अनेकदा असे होते की आपण नोकरी करतो तेथे स्थानिक भूमिकाच घेणे भाग असते. पण ती घेताना आपल्या मजकुरात राज्य, देश आणि जगाच्या दृष्टीकोनाचा अजिबात समावेश केला नाही, असे होता कामा नये.
  • कोणत्याही मांडणीचे माध्यम हे भाषा आहे. ती भाषा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशी आपल्याकडे असू शकते. आपण व्यक्त होतो आहोत ती भाषा आपण शुद्ध लिहितो ना, आपण जे वेगळे शब्द वापरतो आहोत, त्या शब्दांचे कंगोरे आपल्याला माहीत आहेत ना, याचा विचार केला पाहिजे. भाषा तपासण्यासाठी आतापर्यंत वार्ताहर, उपसंपादक, मुद्रितशोधक अशी रचना होती, मात्र आता ती तशी असणार नाही. त्यामुळे आपला मजकूर आपण देतो तसाच प्रसिद्ध झाला पाहिजे, अशी तयारी आता केली पाहिजे.
  • घटना, प्रसंगाचे नेमके वर्णन करणे आणि वर्तमानाला भविष्य, भूतकाळाशी जोडणे, हे पत्रकाराचे कामच आहे. ते कौशल्य आपल्याकडे असलेच पाहिजे. मात्र सध्या हे सर्व ज्या यंत्रतंत्रातून आणि ज्या पद्धतीने पोचविणे आवश्यक आहे, त्या कौशल्यालाही तेवढेच महत्व आले आहे. त्यामुळे विचार मांडणीचे कौशल्य माझ्याकडे आहे, तर मी बाकीचे यंत्रतंत्र का शिकू, असे आता म्हणता येणार नाही. भविष्यात येवू घातलेली सर्वच कौशल्ये महत्वाची आहेत आणि त्याबाबतीत आज असलेले अवलंबित्व कमी कमी करत गेले पाहिजे.
  • पत्रकारांना सर्वच बातम्या द्याव्या लागतात. त्यामुळे काही वेळा स्थानिक राजकीय नेते, नोकरदार व्यावसायिकांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. वार्तांकन हा आपल्या कामाचा भाग असून त्यात आपण वैयक्तिक कोणाची बाजू घेत नाही ना, याची खबरदारी घेतली पाहिजे. आपण सर्वांचे मित्र आहोत आणि कोणाचेच शत्रू नाही, अशीच पत्रकाराची भूमिका असली पाहिजे. विशेषतः शेरेबाजी असलेले लेखन म्हणजेच चांगली पत्रकारिता अशी अनेकांची धारणा बनत चालल्याने आणि चांगले पत्रकार म्हणजे असे शेरेबाजी करणारे पत्रकार असा सार्वत्रिक समज झाल्याने आपणही त्या रांगेत जाऊन बसावे, असा मोह होऊ शकतो. पण त्यामुळे आपण अनेकांना विनाकारण दुखावत असतो, हे लक्षात ठेवावे आणि त्यामुळे मानहानी वाट्याला येवू शकते, याची तयारी ठेवावी. गावाचा, राज्याचा आणि देशाचा कारभार हाकणाऱ्या नेते, अधिकाऱ्यांना जनतेतील जाणकार मतांची गरज असते. केवळ पत्रकारांच्या सल्ल्याची नव्हे, याचे भान ठेवले पाहिजे.
  • गावात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात होणाऱ्या उभारणीला म्हणजेच संपत्ती निर्माण होण्याला फार महत्व आहे. संस्थांची उभारणी ही खूप अवघड असते. व्यापार उदीम हे नेहमीच चढउतारातून चाललेले असतात. त्यामुळे सरकारी आणि खासगी संस्था, संघटनांना आपण काही किरकोळ कारणांनी बदनाम तर करत नाही ना, हे सतत तपासले पाहिजे. विशेषतः काही किरकोळ घटनांच्या बातम्या पानाच्या रचनेसाठी (दूरचित्रवाणीत वेळ भरून काढण्यासाठी) मोठ्या मथळ्याने प्रसिद्ध होतात. या प्रकारची सुरवात आपल्यापासून होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे.
  • नव्या काळात अर्थकारणाला अतिशय महत्व आले आहे. बहुतांश घटनांच्या मुळाशी अर्थकारणच असते. त्यामुळे कोणत्याही लेखनात त्याला महत्व देण्याची गरज आहे. कोणत्याही घटनेमागील अर्थकारणाचा शोध घेतल्यास ती घटना वाचक/ श्रोत्यांपर्यंत चांगली पोचविली जाऊ शकते. यात नेमकी आकडेवारी फार महत्वाची भूमिका पार पाडत असते. मात्र तिचाच सध्या अभाव असतो. अशी खात्रीशीर आकडेवारी देण्याची सवय लावून घेतली पाहिजे. अधिकृत वेबसाईटस् आणि इंटरनेटमुळे ती मिळविणे आता सोपे झाले आहे.
  • व्यक्ती आणि पत्रकार ही भूमिका वेगळी असली पाहिजे, हे योग्यच आहे. मात्र ती तेवढ्या विशिष्ट वेळेपुरतीच असली पाहिजे. त्यामुळे त्यातील भेद कमी करून त्यामुळे वाढणारा आयुष्यातील तणाव कमी केला पाहिजे. पत्रकारांच्या आयुष्यात धावपळ असते, तणाव निर्माण होतात आणि त्यांची प्रकृती बिघडते, असे म्हटले जाते. मात्र असे हे सर्व पत्रकार म्हणून आपण ओढवून तर घेत नाही ना, असा विचार वेळोवेळी केला पाहिजे.
  • आर्थिक नियोजनाला सध्या अतिशय महत्व आले आहे. पत्रकारितेतून आपल्या आर्थिक गरजा भागत नसतील तर आपण आणखी काही किंवा नव्याने काही केले पाहिजे. पत्रकार आहोत म्हणून आपण नव्याने काही करू शकत नाही, हा विचार बाजूला सारून आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर नवे काही करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. विशेषतः पत्रकारितेतून चिटकलेली खोटी प्रतिष्ठा वेळप्रसंगी बाजूला सारली पाहिजे.

नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !

ymalkar@gmail.com

]]>
http://mediacura.com/blog/2018/01/06/patrakardashsutri/feed/ 0